शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:14 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी अनेक राज्यांतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी राहुल गांधी हे सत्य बोलत असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातही मतांची चोरी झाली, असा आरोप केला आहे. शिवाय, भाजपला विरोध करणाऱ्यांनी एकत्र यावे, असेही त्यांनी इतर राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना अबू आझमी म्हणाले की, "भाजपला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र, यावे अशी माझी इच्छा आहे. भाजप सत्तेचा गैरफायदा घेऊन मतांची चोरी करत आहेत. हे खोट नाही तर, सत्य आहे. विधानसभेत माझ्या मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मतांची चोरी झाली. सहा महिन्यापूर्वी मतदान करणाऱ्या मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आणि त्याऐवजी त्यांच्या लोकांची नावे टाकण्यात आली. आपण कितीही आवाज उठवला तरी कोणीही ऐकणार नाही."

राहुल गांधींचा आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फक्त पाच महिन्यांत मतदार नोंदणीत प्रचंड वाढ झाली. काही मतदारसंघांमध्ये तर मतदारांची संख्या स्थानिक लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा अनपेक्षित आणि संशयास्पद पराभव झाल्याचेही त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. "राहुल गांधी वारंवार खोटे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहेत. आधी त्यांनी ७५ लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता, आणि आता तो आकडा १ लाखांवर आणला आहे. राहुल गांधी खोटे बोलून पराभव झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. जनता त्यांना पुढच्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४