शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:14 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचे गंभीर आरोप केले. राहुल गांधींनी अनेक राज्यांतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी राहुल गांधी हे सत्य बोलत असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातही मतांची चोरी झाली, असा आरोप केला आहे. शिवाय, भाजपला विरोध करणाऱ्यांनी एकत्र यावे, असेही त्यांनी इतर राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना अबू आझमी म्हणाले की, "भाजपला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र, यावे अशी माझी इच्छा आहे. भाजप सत्तेचा गैरफायदा घेऊन मतांची चोरी करत आहेत. हे खोट नाही तर, सत्य आहे. विधानसभेत माझ्या मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मतांची चोरी झाली. सहा महिन्यापूर्वी मतदान करणाऱ्या मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आणि त्याऐवजी त्यांच्या लोकांची नावे टाकण्यात आली. आपण कितीही आवाज उठवला तरी कोणीही ऐकणार नाही."

राहुल गांधींचा आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फक्त पाच महिन्यांत मतदार नोंदणीत प्रचंड वाढ झाली. काही मतदारसंघांमध्ये तर मतदारांची संख्या स्थानिक लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा अनपेक्षित आणि संशयास्पद पराभव झाल्याचेही त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. "राहुल गांधी वारंवार खोटे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करत आहेत. आधी त्यांनी ७५ लाख मतदार वाढल्याचा आरोप केला होता, आणि आता तो आकडा १ लाखांवर आणला आहे. राहुल गांधी खोटे बोलून पराभव झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपले आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. जनता त्यांना पुढच्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४