शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सालेमच्या शिक्षेची तारीख ठरणार २२ आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:57 IST

१९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. तर एकाची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. दोषी ठरवलेल्यांना कोणती शिक्षा द्यावी, याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात येणार आहे.मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या ‘केस बी’चा १६ जून रोजी विशेष टाडा न्यायालयाने निकाल दिला. अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना विशेष न्यायालयाचे न्या. जी.ए. सानप यांनी दोषी ठरवले. तर रियाझ सिद्दिकीला टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले, अब्दुल कय्युम याच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरले, असे म्हणत न्या. सानप यांनी कय्युमची सुटका केली.या सर्व दोषींना कोणती शिक्षा ठोठावायची याबाबत सीबीआय वकील व बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सीबीआयच्या वकिलांनी सालेम सोडून सर्वांना फाशी देण्याची विनंती केली. बचावपक्षाच्या वकिलांनी दोषींना दया दाखवण्यात यावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने २२ आॅगस्ट रोजी निकालाची तारीख जाहीर करू, असे स्पष्ट केले.