शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५०० 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:55 IST

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात.

अविनाश साबापुरे  -

यवतमाळ : स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी राज्यातील दीड लाख महिला इतरांच्या मुलांचे शिक्षण तुटू नये म्हणून दररोज झटत आहेत. गोरगरिबांच्या मुलांनी खूप शिकावे, त्यांच्या शाळेत खंड पडू नये म्हणून या ‘आई’ शाळेत दररोज पौष्टिक आहार शिजवून देतात. गेल्या २० वर्षांपासून अवघ्या दीड हजाराच्या मानधनात दिवसभर राबणाऱ्या या ‘आई’ला आता शासनाने एक हजार रुपयांची मानधनवाढ मंजूर केली आहे. मात्र, या अल्पशा वाढीनेही ‘आई’चे हृदय खुश झाले आहे. 

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात. त्यातही हे मानधन सहा-सहा महिने विलंबाने मिळते.  या महिलांनी वारंवार आंदोलने केली. त्याची दखल तब्बल २० वर्षांनंतर शासनाने घेतली. आता राज्य शासनाच्या ९०० रुपयांच्या हिश्श्यात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

त्यामुळे स्वयंपाकी व मदतनीस महिलांना येत्या एप्रिलपासून २,५०० रुपयांचे वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच केंद्राच्या हिश्श्यातही वाढ मिळविण्यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत प्रयत्न केले जाणार आहे. 

असा झाला योजनेचा प्रवास- शालेय पोषण आहार योजना २२ नोव्हेंबर १९९५ पासून सुरू झाली. त्यावेळी ही योजना केवळ पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच होती. २००८ पासून या योजनेची व्याप्ती वाढवून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जाऊ लागला. - सुरुवातीला पोषण आहार योजना, नंतर मध्यान्ह भोजन योजना आणि आता ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना’ असे या योजनेचे नामकरण झाले आहे.

आहार शिजवूनच का?- १९९५ ते २००१ या काळात किमान ८० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्याला दरमहा ३ किलो तांदूळ दिला जात होता. - मात्र, या धान्याची अफरातफर होत असल्याचे पाहून ‘पीपल्स युनियन फाॅर सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेने केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  - २८ नोव्हेंबर २००१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आहार शिजवूनच वाटप करण्याचा आदेश दिला. २००२ पासून आहार शिजवून वाटप केला जाऊ लागला व त्यासाठी स्वयंपाकी, मदतनीस महिलांची नेमणूकही  केली. 

पोषण आहार योजना -पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी -८५,७६१ शाळा, १ कोटी विद्यार्थ्यांना वाटप, १,५८,८२३ महिला स्वयंपाकी/मदतनीस१५००रु. सध्याचे मानधन९००रु. राज्य सरकारकडून६००रु. केंद्र सरकारकडून

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार