शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरता दिन विशेष : शालाबाह्य मुलांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:00 IST

शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. ..

ठळक मुद्दे बालरक्षक चळवळीचा परिणाम: शिक्षण विभागाचा दावा

राहुल शिंदेपुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे ८० हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणले आहे.त्यामुळे राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या घटली असून ‘असर’च्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे.परिणामी पुढील काळात राज्यातील साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. तसेच शालाबाह्य मुलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या कार्यपध्दतीवर टिका केली. त्यामुळे राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये शालाबाह्य मुलांसाठी पूर्णवेळ काम करणा-या बालरक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील तब्बल २८ हजार शिक्षकांनी व शिक्षण अधिका-यांनी बालरक्षक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. तसेच दोन वर्षांपासून शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशित करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ४४ हजार ६०० शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आले. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ३५ हजार ३०४ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सुमारे ८० हजार विद्यार्थी बालरक्षकांच्या प्रयत्नामुळे वर्गात येऊन शिक्षण घेवू लागली.बालरक्षक चळवळीमुळे मागील वर्षी इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात ६ हजार ७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात आले तर ६ हजार १८६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जावून शिक्षण घेणे शक्य झाले. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४ हजार ४८१ शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ३ हजार ७६१,नंदुरबार जिल्ह्यातील ३ हजार ५२७,नाशिकमधील ३ हजार ४८९,पालघरमधील २ हजार १७७ , बीडमधील १ हजार ७७१,जळगावमधील १ हजार ४९३,साता-यातील १ हजार ५३ शालाबाह्य मुले शाळेत दाखल करण्यात आली.-------------

राज्यातील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्गदर्शानाखाली बालरक्षक चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.एकही मुलं स्थलांतरित होऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर विशेष मोहिम राबविण्यात आली.शिक्षकांनी पुढे येऊन बालरक्षक चळवळीत सहभागी होवून दोन वर्षात तब्बल 80 हजार शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले.चांगली कामगिरी बजावलेल्या बालरक्षकांचा येत्या 15 आॅगस्ट रोजी सत्कार केला जाणार आहे.-डॉ.शोभा खंदारे,शिक्षण उपसंचालक,समता विभाग,एससीईआरटी ,पुणे

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार