शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

साक्षरता दिन विशेष : शालाबाह्य मुलांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 07:00 IST

शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. ..

ठळक मुद्दे बालरक्षक चळवळीचा परिणाम: शिक्षण विभागाचा दावा

राहुल शिंदेपुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे ८० हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणले आहे.त्यामुळे राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या घटली असून ‘असर’च्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे.परिणामी पुढील काळात राज्यातील साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. तसेच शालाबाह्य मुलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या कार्यपध्दतीवर टिका केली. त्यामुळे राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये शालाबाह्य मुलांसाठी पूर्णवेळ काम करणा-या बालरक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील तब्बल २८ हजार शिक्षकांनी व शिक्षण अधिका-यांनी बालरक्षक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. तसेच दोन वर्षांपासून शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशित करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ४४ हजार ६०० शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आले. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ३५ हजार ३०४ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सुमारे ८० हजार विद्यार्थी बालरक्षकांच्या प्रयत्नामुळे वर्गात येऊन शिक्षण घेवू लागली.बालरक्षक चळवळीमुळे मागील वर्षी इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात ६ हजार ७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात आले तर ६ हजार १८६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जावून शिक्षण घेणे शक्य झाले. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४ हजार ४८१ शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ३ हजार ७६१,नंदुरबार जिल्ह्यातील ३ हजार ५२७,नाशिकमधील ३ हजार ४८९,पालघरमधील २ हजार १७७ , बीडमधील १ हजार ७७१,जळगावमधील १ हजार ४९३,साता-यातील १ हजार ५३ शालाबाह्य मुले शाळेत दाखल करण्यात आली.-------------

राज्यातील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्गदर्शानाखाली बालरक्षक चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.एकही मुलं स्थलांतरित होऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर विशेष मोहिम राबविण्यात आली.शिक्षकांनी पुढे येऊन बालरक्षक चळवळीत सहभागी होवून दोन वर्षात तब्बल 80 हजार शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले.चांगली कामगिरी बजावलेल्या बालरक्षकांचा येत्या 15 आॅगस्ट रोजी सत्कार केला जाणार आहे.-डॉ.शोभा खंदारे,शिक्षण उपसंचालक,समता विभाग,एससीईआरटी ,पुणे

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार