शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाची प्रेरणा देणारे संत नामदेव अध्यासन

By admin | Updated: April 2, 2015 03:14 IST

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त त्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी यांनी महाराष्ट्रात या कार्याला वाहिलेले संत नामदेव अध्यासन असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ती अमलात आणली. १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हा पुणे विद्यापीठ) संत नामदेव अध्यासनाची स्थापना झाली. प्राचीन व मध्ययुगीन साहित्याचे अभ्यासक, संत नामदेव समाजातील मान्यवर, अनुसूचित जमातीतील तज्ज्ञ, शीख समाजाचे प्रतिनिधी आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी अशी एक सर्वसमावेश जाणकारांची समिती विद्यापीठाने नेमली व ध्येयधोरणे ठरवली. २ नोव्हेंबर १९८५ला पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. विद्यापीठातील अध्यासन हे विद्यापीठ आणि समाज यांना एकत्र आणणारे एक संशोधन केंद्र असते. डॉ. अशोक कामत यांनी ही जाणीव ठेवून संत नामदेव अध्यासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले. अनेक नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळविले. अध्यासनाचे ग्रंथालय सुसज्ज केले. अध्यासनाच्या ग्रंथालयात सुमारे दहा हजारांहून अधिक दुर्मिळ असे संशोधनमूल्य असलेले संदर्भग्रंथ आहेत. भारतीय संत साहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. संशोधन सहायक डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांच्यासह डॉ. सुमती देशपांडे, डॉ. सुनीती तांबे, डॉ. पद्मावती श्रोत्रीय, डॉ. आशा परांजपे, डॉ. अनिता केळकर, डॉ. आशा राशिंगकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. सरोज सबनीस इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. परमहंस श्रीस्वामी स्वरूपानंद मंडळ व कै. मधुसूदन अच्युत केळकर ट्रस्ट या संस्थाच्या निधीतून अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. पां. ना. कुलकर्णी, डॉ. द. गं. कोपरकर, डॉ. ग. वा. तगारे, श्री. कृष्णा मेगसे, प्रा. श्री. मा. कुलकर्णी, डॉ. प्र. न. जोशी, श्री. रवींद्र भट, डॉ. बालाजी तांबे, डॉ. यु. म. पठाण, डॉ. श्रीपाल सबनीस इत्यादी मान्यवरांना आजवर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. आजवर श्री. प्र. द. निकते, डॉ. विलास खोले, प्रा. वा. ल. मंजूळ यांना हे पुरस्कार व शिष्यवृती देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. ही धुरा मी सांभाळत असताना पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ एकोणिसाव्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. ‘भारतीय धर्म-संप्रदाय, तत्त्वज्ञान आणि साहित्य’ यावर व्याख्यानमाला घेतली. ‘नामदेव साहित्यावरील लेखनसूची’लाही प्रारंभ केला आहे. (लेखक संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख आहेत.)