शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘सागर’ वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:17 AM

उष्णतेच्या लाटेचा मात्र कहर : मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले ‘सागर’ नावाचे वादळ सोमालियाचा समुद्र पार करत, पश्चिम-दक्षिणेला सरकले आहे. परिणामी, मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाला या वादळाचा धोका नाही, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धिंगाणा घातला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात उठलेले ‘सागर’ वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेला सरकले. देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून हे वादळ दूर असल्याने त्याचा देशाला धोका नाही.हे वादळ पुढे सरकत आता ते सोमालियाकडे सरसावले. वादळाचा परिणाम म्हणून यमन, सोमालिया आणि सौदी अरेबियाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वादळाच्या दिशेत बदल होत असतानाच, राज्यात वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत.मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे.कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.२० ते २३ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२० ते २१ दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.२२ ते २३ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.रविवारसह सोमवारी मुंबईमधील आकाश निरभ्र राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.राज्यात २०१ जणांना उष्माघाताचा त्रासमुंबई : आठ दिवसांपूर्वी राज्यातील उष्माघातावर उपचार घेणाºयांची संख्या १४९ असताना आरोग्यभवनाकडून नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध रुग्णालयात २०१ जण उष्माघातावर उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अमरावती येथे उष्माघाताने एकाचा बळी गेला आहे.गेल्या वर्षी उष्माघाताने १३ जणांचा बळी गेला होता. उष्माघातावर उपचार घेणाºयांमध्ये नागपूरची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या १२९ इतकी आहे, अशी माहिती राज्य आरोग्य संचालनालयाकडून मिळाली. दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्माघाताचा प्रभाव सर्वाधिक आहे. नागपूर महापालिका क्षेत्राखालोखाल यवतमाळ क्षेत्रात २८, नागपूर जिल्हा २१, बुलढाणा क्षेत्रात १४ असे रुग्ण उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :TemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र