शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मराठा आंदोलन चिघळावे ही सरकारचीच इच्छा - सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:41 IST

मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत.

मुंबई  - मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत. मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याच्या सरकारच्या कुटील कारस्थानाचा हा दुसरा प्रयत्न आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठा मोर्चे निघाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु झाला. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. यानंतर आता राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकाविरोधातला असंतोष निर्माण झालेला पाहिल्यानंतर सरकारच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा निश्चित दिसत असल्यामुळे जातीय ध्रुवीकरणाकरीता मराठा व अन्य समाज असा संघर्ष व्हावा असे कुटील कारस्थान सरकारतर्फे रचण्यात आले आहे असा आरोप सावंत यांनी केला

ते पुढे म्हणाले की, या कट कारस्थानाचा पहिला भाग हा आपल्या हस्तकांद्वारे मराठा आणि दलित समाजातला संघर्ष निर्माण होण्याकरिता भीमा कोरेगावची घडवून आणलेली दंगल होता. याचाच दुसरा भाग म्हणजे मराठा आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान आणि त्यानंतर भाजपच्या पेड ट्रोल्सनी मुख्यमंत्री विठ्ठल सेवक आहेत हे दाखवण्यासाठी ट्वीटरवर ट्रेंड चालवून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दिलेले आव्हान असेल यातूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न झाला.

 सरकारने चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल याकरता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत उलट सरकार वेळकाढूपणा करित आहे. दरम्यानच्या सरकारने मराठा समाजाल दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारची अनास्था, जाणिवपूर्वक केलेली चालढकल आणि जुमलेबाजी यामुळे समाजातील सर्व वर्गाचा सरकारवरील विश्वास उडाला आहे हे स्पष्ट झाले आहे असे सावंत म्हणाले.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतmarathaमराठाreservationआरक्षण