शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मराठा आंदोलन चिघळावे ही सरकारचीच इच्छा - सचिन सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:41 IST

मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत.

मुंबई  - मुख्यमंत्र्यांनी स्वतः हून केलेली बेजबाबदार विधाने, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेले खोटे आरोप हे मराठा आंदोलन अधिक चिघळावे ही सरकारचीच इच्छा असल्याचे निदर्शक आहेत. मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याच्या सरकारच्या कुटील कारस्थानाचा हा दुसरा प्रयत्न आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठा मोर्चे निघाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुरु झाला. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा लाभ घेण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. यानंतर आता राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकाविरोधातला असंतोष निर्माण झालेला पाहिल्यानंतर सरकारच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा निश्चित दिसत असल्यामुळे जातीय ध्रुवीकरणाकरीता मराठा व अन्य समाज असा संघर्ष व्हावा असे कुटील कारस्थान सरकारतर्फे रचण्यात आले आहे असा आरोप सावंत यांनी केला

ते पुढे म्हणाले की, या कट कारस्थानाचा पहिला भाग हा आपल्या हस्तकांद्वारे मराठा आणि दलित समाजातला संघर्ष निर्माण होण्याकरिता भीमा कोरेगावची घडवून आणलेली दंगल होता. याचाच दुसरा भाग म्हणजे मराठा आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान आणि त्यानंतर भाजपच्या पेड ट्रोल्सनी मुख्यमंत्री विठ्ठल सेवक आहेत हे दाखवण्यासाठी ट्वीटरवर ट्रेंड चालवून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दिलेले आव्हान असेल यातूनच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न झाला.

 सरकारने चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल याकरता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत उलट सरकार वेळकाढूपणा करित आहे. दरम्यानच्या सरकारने मराठा समाजाल दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारची अनास्था, जाणिवपूर्वक केलेली चालढकल आणि जुमलेबाजी यामुळे समाजातील सर्व वर्गाचा सरकारवरील विश्वास उडाला आहे हे स्पष्ट झाले आहे असे सावंत म्हणाले.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतmarathaमराठाreservationआरक्षण