शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली', 'सामना'तून घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:25 IST

'पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे.'

मुंबई:कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. चंद्रकांत पाटलांनी तर 'निवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयात जाईन', अशी घोषणा केली होती. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.

'जातीय हिंसा घडवणाऱ्यांना चपराक''कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे. पश्चिम बंगालात भाजपने जिंकलेल्या आसनसोल मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. तेथे तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. छत्तीसगढमध्ये काँग्रेस तर बिहारमधील विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रीय जनता दलाने जिंकली आहे. निवडणुका जिद्दीने, एकजुटीने लढवल्या की भाजपचा पराभव करता येतो हे सूत्र चार राज्यांतील पोटनिवडणुकांत दिसले. जातीय हिंसेवर चिंता व्यक्त करणारे संयुक्त निवेदन 13 पक्षांनी काढले. भाजपचा राजकीय पराभव हाच त्या विंचवावर उतारा आहे. कोल्हापूर व प. बंगालने ते दाखवून दिले.'

'निवडणूक लागताच पाटील गायब झाले''कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. 97,332 मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली 78,025 मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ''कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन'' असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले.'

'पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली''चंद्रकांतदादा पाटील यांनी 'या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ', अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील,' असा टोला पाटलांना लगावण्यात आला आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतkolhapurकोल्हापूर