शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

'चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली', 'सामना'तून घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:25 IST

'पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे.'

मुंबई:कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. चंद्रकांत पाटलांनी तर 'निवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयात जाईन', अशी घोषणा केली होती. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.

'जातीय हिंसा घडवणाऱ्यांना चपराक''कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे. पश्चिम बंगालात भाजपने जिंकलेल्या आसनसोल मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. तेथे तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. छत्तीसगढमध्ये काँग्रेस तर बिहारमधील विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रीय जनता दलाने जिंकली आहे. निवडणुका जिद्दीने, एकजुटीने लढवल्या की भाजपचा पराभव करता येतो हे सूत्र चार राज्यांतील पोटनिवडणुकांत दिसले. जातीय हिंसेवर चिंता व्यक्त करणारे संयुक्त निवेदन 13 पक्षांनी काढले. भाजपचा राजकीय पराभव हाच त्या विंचवावर उतारा आहे. कोल्हापूर व प. बंगालने ते दाखवून दिले.'

'निवडणूक लागताच पाटील गायब झाले''कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. 97,332 मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली 78,025 मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ''कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन'' असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले.'

'पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली''चंद्रकांतदादा पाटील यांनी 'या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ', अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील,' असा टोला पाटलांना लगावण्यात आला आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतkolhapurकोल्हापूर