शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:12 IST

Andheri Bypolls 2022: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत झाले ते शोभनीय नसून, शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण राज्यासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypolls 2022) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ताकदीने कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने यातून माघार घेत भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. यातच अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदाराकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना काँग्रेससह राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीतून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे तटकरे यांनी सांगितले.

शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण महाराष्ट्रासाठी घातक 

मागील वेळेस शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अशीच लढत झाली . भाजपने अपक्ष उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उभे केले होते. त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती. हे आता अनुभवायला मिळाले आहे‌. ऋतुजा लटके यांनी एक महिना आधी राजीनामा दिला होता. त्यांचे एक महिन्याचे वेतन कोषागार कार्यालयातून जमा झाले होते. मात्र, त्यांचा निवडणूक लढविण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने महानगरपालिकेच्या कृतीला चपराक दिले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देण्याच्या घटना घडत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका सुनील तटकरे यांनी केली. 

दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झाले ते शोभनीय नाही. वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे, प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जात असतो. जनता त्याबाबत योग्य तो निर्णय घेत असते. पण निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुद्दाम बाजूला करून निवडणूक लढता येऊ नये असे कृत्य शासन मान्य यंत्रणेच्या माध्यमातून करणे चुकीचे आहे, असे तटकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे