शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:12 IST

Andheri Bypolls 2022: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत झाले ते शोभनीय नसून, शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण राज्यासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypolls 2022) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ताकदीने कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने यातून माघार घेत भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. यातच अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदाराकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना काँग्रेससह राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीतून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे तटकरे यांनी सांगितले.

शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण महाराष्ट्रासाठी घातक 

मागील वेळेस शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अशीच लढत झाली . भाजपने अपक्ष उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उभे केले होते. त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती. हे आता अनुभवायला मिळाले आहे‌. ऋतुजा लटके यांनी एक महिना आधी राजीनामा दिला होता. त्यांचे एक महिन्याचे वेतन कोषागार कार्यालयातून जमा झाले होते. मात्र, त्यांचा निवडणूक लढविण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने महानगरपालिकेच्या कृतीला चपराक दिले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देण्याच्या घटना घडत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका सुनील तटकरे यांनी केली. 

दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झाले ते शोभनीय नाही. वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे, प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जात असतो. जनता त्याबाबत योग्य तो निर्णय घेत असते. पण निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुद्दाम बाजूला करून निवडणूक लढता येऊ नये असे कृत्य शासन मान्य यंत्रणेच्या माध्यमातून करणे चुकीचे आहे, असे तटकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे