शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:40 IST

Girish Mahajan on Unmesh Patil, Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले.

खासदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपा सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. 

उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता. भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी, खासदारकी आम्ही दिली होती. त्यांनी जाण्याची घाई केली.भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही, असे महाजन म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे. महायुतीत असताना आमच्याशी गदारी केली. तुम्ही अल्पशा सुखासाठी दुःखात गेला आहात. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे आव्हान महाजन यांनी दिले. 

तसेच एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले. खडसे यांनी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला असून काही इंग्रजी दैनिकांमध्ये या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर आमदार झाले होते. मंत्री झाले होते. एकनाथ खडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामासाठी कुठे प्रचारक नव्हते. 

त्यांचे मोदींशी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्याशी संबंध आहेत असे ते  म्हणाले होते. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खडसे यांचे जर मोदी शहा यांच्याशी चांगले संबंध होते तर त्यांना वाईट दिवस का आले? असा सवाल करत त्यांनी दिल्लीत प्रवेश केला याबद्दल मला काही माहीत नाही, असे महाजन म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे, असे उन्मेष पाटील म्हणालेले. त्यांनी पक्ष सोडला असून ते आता काहीही टीका करू शकतात.

पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगितले होते. मी त्यांना समज दिली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती. ते जर आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असेल तर त्यांनी आपलं काय चुकल म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला महाजन यांनी दिला. उन्मेष पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे. आमच्याकडे त्यांना भविष्य होते. त्यांना नंतर कळेल की आपण काही चूक केली, असेही महाजन म्हणाले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाeknath khadseएकनाथ खडसे