शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

एसटी रूपडे पालटणार

By admin | Updated: July 17, 2016 00:27 IST

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेली एसटी ही सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ समजली जाते. मात्र अशा या ‘जीवनवाहिनी’ला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे.

 - सुशांत मोरेशहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पोहोचलेली एसटी ही सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ समजली जाते. मात्र अशा या ‘जीवनवाहिनी’ला सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. बसेसची झालेली दुरवस्था, त्याचबरोबर स्थानक आणि आगारांमधील अस्वच्छता, वाढलेले ‘वडाप’चे वर्चस्व आणि त्यामुळे कमी होत असलेले प्रवासी व उत्पन्न पाहता एसटीत सुधारणा होणार कधी, असा प्रश्न पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून काही नियोजन करण्यात आले असून, त्यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्याशी केलेली बातचीत...एसटी महामंडळ आता जवळपास दोन हजार कोटींचा तोटा सहन करत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का?तोटा कमी करण्यासाठी आमच्याकडून पुरेपूर प्रयत्न होत आहेत. इंधन खर्च कमी कसा करता येईल; त्याचबरोबर प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करून तसे नियोजनही करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील सेवांवर लक्ष केंद्रित करतानाच शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील स्थानिक पातळीवर जास्तीतजास्त कशी सेवा देता येईल याचा विचार करून तशी यंत्रणा राबविली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुविधा आणि स्वच्छता असल्यास प्रवासी आकर्षित होतील हे जाणून आम्ही त्यादृष्टीने पाऊल उचलत आहोत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसमध्ये वायफाय सुविधाही उपलब्ध करून त्याद्वारे स्मार्ट फोनवर प्रवाशांना गाणी, चित्रपट कसे पाहता येतील यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. या वर्षात सर्व बसमध्ये १०० टक्के अशा प्रकारची सुविधा दिली जाणार आहे.

महामंडळाची अनेक बस स्थानके, आगार आणि बसमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसतो? सर्व आगार आणि बस स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आगार आणि स्थानके स्वच्छ राहावीत यासाठी आम्ही ‘आउटसोर्सिंग’ करणार आहोत. खाजगी कंपन्यांद्वारे स्वच्छतेचे काम केले जाईल. या कामाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. बस स्थानके, टॉयलेट तसेच चालक व वाहकांचे रेस्ट रूम कसे स्वच्छ राहतील यावर भर देऊ. आउटसोर्सिंग करून ही प्रक्रिया राबविण्यासाठी साधारपणे पाच महिन्यांचा कालावधी लागेल. यामुळे एसटीचा कायापालट नक्की होईल. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता ठेवण्यासाठी एसटी अधिकाऱ्यांनाही काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. यात टॉयलेटबाबतीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टॉयलेटची दुरवस्था असेल किंवा अस्वच्छ असतील तर ते त्वरित दुरुस्त किंवा स्वच्छ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. चालक आणि वाहकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांना प्रशिक्षण देतानाच स्वच्छता कशी राखता येईल याची माहिती दिली जाते.

एसटीचे अपघात कमी कसे होतील? यासाठी काही नियोजन करण्यात आले आहे का?अपघात हा कळीचा मुद्दा असून, ते कमी कसे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या 0.१५ प्रत्येक लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण आहे आणि मागील वर्षाशी तुलना केल्यास ते कमी आहे. अपघातांत बसेसचे नुकसान कमी व्हावे आणि प्रवाशांनाही इजा पोहोचू नये किंवा त्याचे प्रमाण फार कमी असावे याकडेही आम्ही विशेष लक्ष देत असून, त्यासाठी एसटी बसचे डिझाईनही बदलण्यात येत आहे. एसटी बसची बॉडी ही स्टीलची केली जाणार असून, त्यांची उंचीही वाढविण्यात येणार आहे आणि त्यावर काम सध्या सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या चालकांकडून अपघात होऊ नये यासाठी प्रशिक्षित असे चालकच आम्ही घेतो. चालकांची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते आणि ही टेस्ट खूप कठीण असते. त्यात पास झाल्यावरच त्यांना घेतले जाते. या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होण्याचे प्रमाण हे ३0 टक्के आहे. त्यामुळे एसटीच्या चालकांकडून सहसा अपघात होत नाहीत.

गेल्या चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. ही संख्या कशी वाढवणार?आमच्या दृष्टीने प्रवासी हे महत्त्वाचेच आहेत आणि त्यांना जास्तीतजास्त आणि चांगल्या सुविधा कशा दिल्या जातील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसची स्थिती बदलण्याबरोबरच उत्तम सुविधा, सुरक्षा, वेळेवर बस सोडणे, स्थानक आणि आगारांत चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आम्ही काही नियोजनही केले आहे; आणि त्याची अंमलबजावणीही त्वरित केली जाईल. आम्ही बस स्थानकांचे डिझाईन बदलणार असून, त्यासाठी आर्किटेक्टचीही नियुक्ती केली जात आहे. तसेच १३ ठिकाणी बस पोर्ट उभारले जाणार आहेत. यातून प्रवाशांना सुविधा देतानाच उत्पन्नही कसे मिळवता येईल याचे नियोजन आम्ही केले आहे. आता २४ बस स्थानकांचे काम दिले असून, तीन वर्षांत आणखी काही बस स्थानकांचा आर्किटेक्टमार्फत कायापालट केला जाईल. तसेच स्थानकांतील प्रवाशांच्या सोयीसाठी एन्ट्री-एक्झिट बदलणे, टॉयलेटची चांगली सुविधा, कॅन्टीनमध्येही सुधारणा केली जाणार आहे.

‘वडाप’मुळे एसटी महामंडळाचे किती उत्पन्न बुडत आहे? त्याला कसा आळा बसेल?एक सर्वेक्षण झाले होते. त्या सर्वेक्षणानुसार वडापवाल्यांना दररोज १६ ते १७ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. मात्र त्यांची संख्या सांगणे कठीण आहे. वडापमुळे एसटीचे नुकसान होत आहे ही बाब खरी आहे. ते नुकसान होऊ नये यासाठी ग्रामीण भागात अधिकाधिक सेवा दिली जाईल. काही ठिकाणी मिडी बस सुरू करण्याचे नियोजन आहे. एसटीची सेवा सुधारली तर नक्कीच आम्ही वडापवर मात करू आणि ही सेवा सुधारतही आहे. एखादा अपघात झाल्यास एसटीकडून अपघातग्रस्त प्रवाशाला किंवा त्याच्या नातेवाइकाला नुकसानभरपाई दिली जाते. मात्र वडापमधून प्रवास करणाऱ्यांचा अपघात झाल्यास नुकसानभरपाईचा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे.एसटी महामंडळाने बीओटी तत्त्वावर ३५ बस स्थानकांचा विकास करण्याचे नियोजन केले असून, यातील बहुतांश स्थानकांचा विकासही करण्यात आला आहे. आता बस पोर्ट आणि काही स्थानकांचा आर्किटेक्टमार्फत विकास करणार आहोत. यातून एकच उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे ते म्हणजे प्रवाशांना चांगली सुविधा देणे आणि अधिकाधिक उत्पन्न मिळविणे.

डबल डेकर बसचा प्रयोग यशस्वी होईल का?एसटीत सध्या डबल डेकर बस नाही आणि ही बस एसटीच्या ताफ्यात आणून प्रवाशांसाठी चालवणे अशी कल्पना खूप चांगली आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि एकाच मार्गावर अनेक फेऱ्या चालवून होणारा जास्त खर्चही टाळता येईल. मुंबईतील बेस्ट प्रशासनाची डबल डेकर बस घेऊन मुंबई-पुणे मार्गावर त्याची चाचणी करण्याचा विचार होता. मात्र बेस्टची बस वजनदार आणि उंचीणेही जास्त असल्याने त्या बसला घेऊन करण्यात येणारी चाचणी आम्ही नाकारली. परदेशी कंपन्याकडे डबल डेकर बस असून, त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. यात स्कॅनिया, व्होल्वो इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

एसटीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुटवडा आहे. कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कसा कमी कराल?एसटीत सव्वा लाख कर्मचारी काम करीत आहेत. प्रत्येक वर्षी अनेक कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यामुळे जागा रिक्त होतात. त्या जागा आम्ही भरतोच. प्रामुख्याने कामाचा ताण पडतो तो चालक व वाहकांवर. त्यामुळे त्यांच्या जास्तीतजास्त जागा भरून ताण कसा कमी करता येईल, याचा प्रयत्न करीत आहोत. येत्या काही महिन्यांत सहा हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार असून, यामध्ये चालक व वाहकांचा समावेश असेल.

अधिकृत थांबा नसतानाही एसटी बस हॉटेलवर थांबा देतात. त्यामुळे प्रवाशांची लूट होते. ही लूट कशी थांबेल?एसटी महामंडळाकडून आणखी काही थांब्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात त्यांच्याकडून योग्य सुविधा दिल्या जातील का, त्यांचे दर कसे आहेत, प्रवाशांची लूट तर होणार नाहीना याची माहिती घेतली जात आहे. त्या सर्वेक्षणानंतरच ते थांबे अधिकृत करू. जर एखाद्या चालक आणि वाहकाकडून अनधिकृत थांबा देण्यात आला तर त्यांच्यावर आमच्याकडून कठोर कारवाई केली जाते.

एसटीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वेतन सुधारणा समिती स्थापन केली आहे. त्यामुळे काय बदल होईल?वेतन सुधारणा समितीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. यामुळे वेतन सुधारणा तर होईल शिवाय कर्मचाऱ्यांत एकसमानता येईल. कामाप्रमाणे वेतन कसे देता येईल हे वेतन सुधारणा समितीतून पुढे येईल. साधारपणे येत्या तीन महिन्यांत त्याचा अहवाल सादर होईल. एसटीचा कर्मचारी व कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि तोच या एसटीचा कणा आहे.