शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

एमएसआरडीसीला ६८९० कोटींचा तोटा

By admin | Updated: May 13, 2015 01:33 IST

पांढरा हत्ती बनलेल्या एमएसआरडीसीचा तोटा ६८९० कोटींच्या घरात गेला असून शासन दिरंगाईमुळे या महामंडळाला ५२६२ कोटींचे व्याज निष्कारण

अतुल कुलकर्णी, मुंबईपांढरा हत्ती बनलेल्या एमएसआरडीसीचा तोटा ६८९० कोटींच्या घरात गेला असून शासन दिरंगाईमुळे या महामंडळाला ५२६२ कोटींचे व्याज निष्कारण द्यावे लागले आहे. परिणामी महामंडळाची बाजारात पत उरलेली नाही.राज्य सरकारने या खात्याकडे असणाऱ्या अनेक योजनांना लाल झेंडा दाखवल्यामुळे या खात्याकडे कामच उरलेले नाही. अधिकारी, कर्मचारी एवढे निवांत आहेत की त्यांच्यात क्रिकेटचे सामने झाले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतल्यानंतर अनेक विषय एमएसआरडीसीकडून काढून घेतले गेले किंवा अमूक विषयाचा पाठपुरावा आपण करू नये असे तोंडी आदेश या विभागाला दिले गेले. मध्यंतरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली इम्पॉवर्ड कमिटीची बैठक झाली. त्यात बहुचर्चित पेडर रोड उड्डाणपुलावर फुली पडली. वरळी-हाजीअली सागरी सेतूदेखील गुंडाळण्यात आला. कारण वरळी-हाजीअली-वांद्रे-वर्सोवा असा कोस्टल रोड महापालिकेतर्फे करण्याचे घाटले जाऊ लागले. त्यासोबतच ठाणे खाडीपूल ३ या प्रकल्पांचा पाठपुरावा एमएसआरडीसीने करू नये, अशा सूचना केल्या गेल्या. हा खाडीपूल पीडब्ल्यूडीकडे देण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम गुंडाळले गेले आहे. एनएच चारवर नवीन कामासाठी ४०० कोटी रुपये मंजूर झाले. मात्र त्यावर पुढे काहीच झालेले नाही. कार टोलमाफीमुळे घोडबंदर रोडवरील उन्नतमार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वारगेट पुणे इंटिग्रेटेड टर्मिनसचे काम थंड्या बस्त्यात गेले आहे. मुंबई-पुणे स्मार्ट सिटी करण्याचा प्रकल्पही कागदावरच उरला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र लोणावळ्यापर्यंत गेले तर सिडकोचा नयना प्रकल्प खोपोलीपर्यंत आल्यामुळे एमएसआरडीसीची स्मार्ट सिटी केवळ कागदावर उरली आहे.मुंबई जलवाहतूक महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे दिली गेली. इस्ट कोस्ट व वेस्ट कोस्टच्या निविदा काढल्या गेल्या, त्यातल्या एकाला मान्यता दिली गेली, पण ते आता रद्द करून सगळे मॉडेलच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (उद्याच्या अंकात :पीडब्ल्यूडीचे अतिक्रमण)