शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एक जागा मुंबईतली, एक बाहेरची... छोट्या-मोठ्या भावांकडे मागणी आठवलेंची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:29 IST

शिवसेना, भाजपाकडे रिपाईंची नवी मागणी

मुंबई: शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी एनडीएकडे दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत कायम राहू. मात्र आम्हाला दोन जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी केली. शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाईंसाठी सोडावी, असं आठवलेंनी म्हटलं आहे. 'रिपाईंच्या काही मागण्यात आहेत. लोकसभेच्या 2 जागा आम्हाला हव्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा आमच्यासाठी सोडावी. यातील एक जागा मुंबईतली असावी आणि दुसरी मुंबईबाहेरची असावी,' अशी मागणी आठवलेंनी केली. त्यामुळे आता युतीमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन घमासान होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेनं गेल्याच आठवड्यात युतीची घोषणा केली. या चर्चेत आपल्याला विश्वासात घेण्यात आलं नाही, असं म्हणत आठवलेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजपा 25 जागा लढवेल, अशी घोषणा भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. या जागावाटपावर आठवलेंनी आक्षेप घेतला होता. भाजपा आणि शिवसेनेनं रिपाईंवर अन्याय केल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती. 'युतीच्या वाटाघाटीत दोघांच्याच जागा वाटपावर तोडगा निघाला आहे. आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. तसंच बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही,' असं आठवलेंनी चारच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. यानंतर आज त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं प्रमुख कार्यंकत्याबरोबर चर्चा केली.रिपाईंनं दोन जागांची मागणी केली असताना महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं भाजप-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला 5 जागा देण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या 5 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mumbaiमुंबई