‘वेगळ्या विदर्भाची भूमिका अव्यवहार्य’

By Admin | Updated: March 27, 2016 01:17 IST2016-03-27T01:17:53+5:302016-03-27T01:17:53+5:30

सध्या गाजत असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी व्यवहार्य नाही, परंतु विदर्भ, मराठवाड्याचा विकास झालाच पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

'The role of a different Vidharbha is impractical' | ‘वेगळ्या विदर्भाची भूमिका अव्यवहार्य’

‘वेगळ्या विदर्भाची भूमिका अव्यवहार्य’

नाशिक : सध्या गाजत असलेल्या वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी व्यवहार्य नाही, परंतु विदर्भ, मराठवाड्याचा विकास झालाच पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने आयोजित छोटेखानी सत्कार समारंभ व पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘‘महाराष्ट्राचे तुकडे होऊ नयेत, परंतु पश्चिम महाराष्ट्राने विदर्भ, मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला आहे. विदर्भ, मराठवाड्याचा विकास झाला नाही तर तेथील जनता माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: 'The role of a different Vidharbha is impractical'