शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

अलविदा रॉकी! गुन्हेगारांचा कर्दनकाळ काळाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 15:56 IST

रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

बीड – जिल्ह्यातील पोलीस दलात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या रॉकी नावाच्या श्वानाचे शनिवारी दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे पोलीस दलातील जवानांना अतिशय दु:ख झाले. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रॉकीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. रॉकीवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे शनिवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! 

रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात बीडच्या श्वानांनी अव्वल स्थानही पटकावलेले होते. यामुळे बीड पोलिसांची मानही उंचावली होती. अगदी स्त्रीभ्रूण हत्येपासून ते खुनाच्या अरोपी, काळेगावचे रेडिओ स्फोटापर्यंतच्या गुन्ह्यात श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली होती.

बीड जिल्हा पोलीस दलात डॉन, रॉकी, मार्शल, चॅम्प, जॉनी, बोल्ट अशी सहा श्वान कार्यरत होते. यातील रॉकी, डॉन आणि जॉनी हे तीनही श्वान अनुभवी आहेत. त्यातील रॉकीचं शनिवारी निधन झालं. उस्मानाबाद जिल्ह्यात पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला होता. यामध्ये घटनास्थळी कसलाही पुरावा नव्हता. मात्र रॉकी या अनुभवी श्वानाने अधिकाऱ्यांना आरोपीच्या घरापर्यंत पोहचविले होते. त्यामुळे उस्मानाबाद पोलिसांना या खूनाचा तपास करण्यात यश आले होते. तसेच ज्या प्रकरणामुळे बीड जिल्हा बदनाम झाला त्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात अर्भक टाकलेल्या ठिकाणी श्वानानींच पोहोचविले होते. या प्रकरणात श्वानांची भूमिका खुप महत्वपूर्ण राहिली होती. चोरी, दरोडा, खून यासह व्हीआयपी बंदोबस्त, सार्वजनिक ठिकाणे, मर्मस्थळांची तपासणीही या श्वानांमार्फत केली जाते. त्यामुळे बीड जिल्ह्यात गैरप्रकार घडला नाही. हे टाळण्यात श्वानांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख