कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:33 IST2025-09-24T06:33:07+5:302025-09-24T06:33:40+5:30

ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील. 

Ro-Ro service to Konkan from October; Sindhudurg can be reached in five and a half hours, what is the fare? See | कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा

कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा

मुंबई : मुंबईतून कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते जयगड व तिथून पुढे विजयदुर्ग अशा या सेवेचा प्रवास असणार आहे. तिचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे २५ नॉट्स असेल त्यामुळे कमी कालावधीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोचता येईल.

भाऊचा धक्का येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी ही सेवा चालवली जाईल. यासाठी १४७ परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील. 

वाहनक्षमता - प्रवासी : ६५६ 

चारचाकी - ५० 

दुचाकी- ३० 

प्रवासाचा कालावधी 

मुंबई - रत्नागिरी- ३ ते ३.५ तास
मुंबई - सिंधुदुर्ग - ५ ते ५.५ तास

जलद प्रवास 
आवश्यक  परवानग्या मिळाल्या आहेत.  हा जलद प्रवास असेल. ३० वर्षांनंतर पुन्हा ही सेवा सुरू होतेय.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडली होती, अशी प्रतिक्रीया मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली. 

प्रवासादरम्यानची जेटी-स्थानके

मुंबई : भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) 

रत्नागिरी : जयगड 

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग 
(४० किमीवर बस सुविधा मिळेल) 

प्रति प्रवासी  भाडे - रु.
फर्स्ट क्लास    ९,००० 
बिझनेस क्लास    ७,५००  
प्रीमियम इकॉनॉमी    ४,०००  
इकॉनॉमी    २,५००  

Web Title: Ro-Ro service to Konkan from October; Sindhudurg can be reached in five and a half hours, what is the fare? See

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.