शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

लेखनासाठीही रियाझ आवश्यक

By admin | Updated: January 21, 2017 01:05 IST

जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे.

पुणे : जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयांचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकाकडे विधायक दृष्टी, सखोल वाचन असावे लागते. लेखनासाठी त्यांनाही रियाझ आवश्यक असतो. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी लेखकांप्रमाणे वाचकांचीही आहे. आपली मुले, नातवंडे मराठी वाचतात का, याचा शोध स्वत:च्या घरापासून सुरू करायला हवा. मराठी समृद्ध असल्यामुळे लोप पावणारच नाही; मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मसापच्या पटवर्धन सभागृहात शुक्रवारी पार पडला. इंदुमती जोंधळे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, आमंत्रक वि. दा. पिंगळे व्यासपीठावर होते. विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला दिवाळी अंकांची १०७ वर्षांची अखंडित परंपरा लाभली आहे. प्रदीर्घ, गौरवशाली प्रवास असलेला दिवाळी अंक म्हणजे अक्षरोत्सव, ज्ञानोत्सव असतो. ज्ञान हाच प्रकाश आणि प्रकाश हेच ज्ञान, हे सूत्र दिवाळी त्यामधून प्रतीत होते. दिवाळी अंकांनी वाचनसंस्कृती रुजवली आणि जोपासली. भाषा समृद्ध असेल तर संस्कृतीही समृद्ध होते. भाषा टिकविण्याचे, मूल्यव्यवस्था जपण्याचे काम या अंकांनी केले आहे.’’ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या उपक्रमाचे आणि पुरस्कारार्थींचे त्यांनी आवर्जून अभिनंदन केले.ज्योत्स्ना चांदगुडे, अनिल सोलंकर, धनंजय गुंजाळ तसेच नमिता कीर, किरण केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणेबाळकृष्ण कवठेकर (अंतर्नाद), नमिता कीर (झपुर्झा), ॠता बावडेकर (साप्ताहिक सकाळ), हितेंद्र नाईक (चतुरंग अन्वय), किरण केंद्रे (किशोर), लक्ष्मीकांत देशमुख (बाटगी विहीर, उद्याचा मराठवाडा), वसंत आबाजी डहाके (अर्धनारीश्वर, पुणे पोस्ट) व सायली राजाध्यक्ष (डिजिटल).>एखादा लेखक समाजाविषयी लिहितो, तेव्हा सर्वसमावेशक चित्रण करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याबाबत समाजाकडून विपरित मते व्यक्त होऊ शकतात. जे. पी. मुरुग्गन प्रकरणाबाबत ‘लेखक पुनरुज्जीवित झाला आहे’ असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने लेखकाच्या भावना, संवेदना जाणून घेऊन दिला. तो अत्यंत वाचनीय आहे. याबाबतच्या ‘अर्धनारीश्र्वर’ या लेखासाठी मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गौरव आहे.- प्रा. वसंत आबाजी डहाके