शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

लेखनासाठीही रियाझ आवश्यक

By admin | Updated: January 21, 2017 01:05 IST

जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे.

पुणे : जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयांचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकाकडे विधायक दृष्टी, सखोल वाचन असावे लागते. लेखनासाठी त्यांनाही रियाझ आवश्यक असतो. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी लेखकांप्रमाणे वाचकांचीही आहे. आपली मुले, नातवंडे मराठी वाचतात का, याचा शोध स्वत:च्या घरापासून सुरू करायला हवा. मराठी समृद्ध असल्यामुळे लोप पावणारच नाही; मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मसापच्या पटवर्धन सभागृहात शुक्रवारी पार पडला. इंदुमती जोंधळे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, आमंत्रक वि. दा. पिंगळे व्यासपीठावर होते. विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला दिवाळी अंकांची १०७ वर्षांची अखंडित परंपरा लाभली आहे. प्रदीर्घ, गौरवशाली प्रवास असलेला दिवाळी अंक म्हणजे अक्षरोत्सव, ज्ञानोत्सव असतो. ज्ञान हाच प्रकाश आणि प्रकाश हेच ज्ञान, हे सूत्र दिवाळी त्यामधून प्रतीत होते. दिवाळी अंकांनी वाचनसंस्कृती रुजवली आणि जोपासली. भाषा समृद्ध असेल तर संस्कृतीही समृद्ध होते. भाषा टिकविण्याचे, मूल्यव्यवस्था जपण्याचे काम या अंकांनी केले आहे.’’ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या उपक्रमाचे आणि पुरस्कारार्थींचे त्यांनी आवर्जून अभिनंदन केले.ज्योत्स्ना चांदगुडे, अनिल सोलंकर, धनंजय गुंजाळ तसेच नमिता कीर, किरण केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणेबाळकृष्ण कवठेकर (अंतर्नाद), नमिता कीर (झपुर्झा), ॠता बावडेकर (साप्ताहिक सकाळ), हितेंद्र नाईक (चतुरंग अन्वय), किरण केंद्रे (किशोर), लक्ष्मीकांत देशमुख (बाटगी विहीर, उद्याचा मराठवाडा), वसंत आबाजी डहाके (अर्धनारीश्वर, पुणे पोस्ट) व सायली राजाध्यक्ष (डिजिटल).>एखादा लेखक समाजाविषयी लिहितो, तेव्हा सर्वसमावेशक चित्रण करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याबाबत समाजाकडून विपरित मते व्यक्त होऊ शकतात. जे. पी. मुरुग्गन प्रकरणाबाबत ‘लेखक पुनरुज्जीवित झाला आहे’ असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने लेखकाच्या भावना, संवेदना जाणून घेऊन दिला. तो अत्यंत वाचनीय आहे. याबाबतच्या ‘अर्धनारीश्र्वर’ या लेखासाठी मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गौरव आहे.- प्रा. वसंत आबाजी डहाके