शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

बालकांचा हक्क न्यायाच्या प्रतीक्षेत!;आयोगाचा संथगती कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 2:11 AM

राज्यातील बालकांच्या हक्कांसाठी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगावर आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सन २०१५ ते २०१८ या ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.

 मुंबई : राज्यातील बालकांच्या हक्कांसाठी सर्वांत महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य बाल हक्क व संरक्षण आयोगावर आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सन २०१५ ते २०१८ या ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. यामध्ये शिक्षण हक्क कायद्यातील बालकांच्या अधिकार पायदळी तुडवण्यापासून ते लैंगिक अत्याचाराच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे बालकांचा हक्क न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळतआहे.न्यायालयाच्या तारखांपेक्षाही उशिरा न्याय देण्याचे काम आयोग मागील अनेक वर्षांपासून करीत असल्याचे या माहिती अधिकाराच्या माहितीमधून स्पष्ट झाले आहे. बाल हक्कासाठी लढणारे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद तुळसकर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या अर्जास महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने उत्तर दिले असून ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय घेतल्याची माहिती त्यांना आयोगानेच दिली आहे. म्हणजे २०१५ पासून आयोगाकडे दाखल झालेल्या २८० तक्रारींंपैकी केवळ ३३ प्रकरणांवर अंतिम आदेश देण्यात आले असून तब्बल २४७ तक्रारी या अजूनही प्रलंबित आहेत. इतकेच नाहीतर, मागील काही महिन्यांपासून आयोगाकडून कित्येक प्रकरणांची सुनावणीच स्थगित करण्यात आली असून अनेक प्रकरणांबाबत बालकांचे गंभीर शैक्षणिक व इतर मूलभूत हक्कांचे हनन होत असूनही याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही, असे तुळसकर यांनी सांगितले.धनादेश केला शासनास परतनुकतेच महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी सरकारने आयोगातर्फे खर्चासाठी मागणी केलेल्या रकमेपैकी ५०% हून कमी निधी दिल्याने, तसेच आयोगाने मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याच संख्येस मान्यता दिल्याने, सुमारे ५० लाखांहून अधिक रकमेचा चेक हा आयोगाकडून शासनास परत करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे तुळसकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र