शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय आता ६२ वर्ष; ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:03 IST

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला.

ठळक मुद्देबुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झालीराज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यतासार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देणार

मुंबई – मागील एक वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीनं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना काळात आरोग्य विभागातील त्रुटींची प्रखरतेने जाणीव झाली. अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे अनेकांचे प्राण गेले. कोरोना महामारीनं आरोग्य या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. त्यामुळे अनेक देश आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देत आहेत.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव दिसून आला. अनेक पदं रिक्त असल्याने सक्रीय कर्मचाऱ्यांवर ताण पडला. कोरोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी निवृत्त होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत याच संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.

आजच्या मंत्रिमंडळात ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता

राज्यातील सार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार

कोविड सादरीकरण

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हीडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अलीकडेच झालेल्या बैठकीत म्हटलं होतं.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेHealthआरोग्यMedicalवैद्यकीय