शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 15:43 IST

राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्दे १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल २२.६५ टक्के इतका लागला आहे. परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलै २०१७ मध्ये २४.९६ टक्के तर जुलै २०१६ मध्ये २७.०३ टक्के निकाल लागला होता. बारावीच्या एकूण १३१ विषयांची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी हा निकाल जाहीर केला आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. बारावीमध्ये निकाल लागल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी गेल्या ३ वर्षांपासून आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विभागनिहाय पुणे २०.७७, नागपूर २५.५१, औरंगाबाद २८.५०, मुंबई १९.२७, कोल्हापूर २५.९४, अमरावती २१.४४, नाशिक २२.३२, लातूर ३१.४८, कोकण १९.७५ असा निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पडताळणी करावयाची असल्यास दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थी