शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

31 मेपर्यंत निर्बंध कायम; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:10 IST

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

अतुल कुलकर्णी - मुंबई : राज्यभरात वाढत असलेला कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लागू केलेल्या कडक निर्बंधांची मुदत आता ३१  मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. ‘लोकमत’ने या दोन्ही बातम्या या अगोदरच प्रकाशित केल्या होत्या. (Restrictions remain in place until May 31; Vaccination between the ages of 18 to 44 has been stopped by the Cabinet)पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. पूनावाला दर महिन्याला दीड कोटी लसींचा डोस देण्यासाठी तयार आहेत. २० मेपासून ते लस देणे सुरू करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूनावाला आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची चर्चा झाली. त्याची फारशी वाच्यता होऊ नये, असा पूनावाला यांचाही आग्रह होता, असे सूत्रांनी सांगितले. ते डोस आल्यानंतर लसीकरण मोहीम वेग घेईल. त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. त्यासोबतच कोव्हॅक्सिनचे डोस मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला देऊ, असे भारत बायोटेकच्या संचालकांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्यात १ कोटी ८८ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, त्यातील फक्त ३६ लाख ५४ हजार लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत २० तारखेपर्यंत राज्यात शिल्लक असलेल्या १० लाख डोसमधून दुसरा डोस न मिळालेल्या लोकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लाटच्या सूचना  येत्या १५ दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभे करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पालकमंत्री यांनी लक्ष केंद्रित करावे. विभागीय आयुक्तांनी ऑक्सिजन प्लांटच्या कामाचा आढावा घ्यावा. जी कामे गतीने करण्याची आवश्यकता आहे, ती पूर्ण करावीत, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्या, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी  अदर पूनावाला यांची चर्चा   चर्चेने निर्णयाची मुभा-  महाराष्ट्रात १५ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. आणखी १५ दिवस हे निर्बंध लागू करत असताना, त्यातील ६ ते ७ दिवस वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही, असाही सूर बैठकीत उमटला. -  काही जिल्ह्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. ज्या जिल्हा प्रशासनाला आपल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करावेत, असे वाटत असेल, त्यांना त्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. -  जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी आपापसात चर्चा करून तसे निर्णय घ्यावेत, अशा सूचना राज्यात देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

देशात कोरोनामुळे -४,२०५ - जणांचा मृत्यू३,४८,४२१ - नवे रुग्ण२,३३,४०,९३८ - देशात एकूण रुग्ण३७,०४,०९९ - उपचाराधीन ९३,८२,६४२ - बरे झाले 

नवी दिल्ली - देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४,२०५ जणांचा मृत्यू झाला, तर ३,४८,४२१ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण मृत्यूसंख्या २,५४,१९७ झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे म्हटले. 

आयसीएमआरकडील माहिती... - ११ मेपर्यंत ३०,७५,८३,९९१ नमुने तपासले गेले असून, मंगळवारी १९,८३,८०४ नमुन्यांची तपासणी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे