शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

" शहरांच्या नामांतरामुळे काहीही फरक पडणार नाही; त्यापेक्षा..." ; भाजपच्या माजी खासदाराचा टोला

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 20, 2021 21:08 IST

एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पक्षाच्या एका माजी खासदाराने मात्र आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून जोरदार घमासान सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी आघाडी व भाजपमधील वरिष्ठ नेतेमंडळी सोडताना दिसत नाही.एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनाकाँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे भाजपच्या एका माजी खासदाराने राज्य सरकारला सल्ला 'हा' खास टोला लगावला आहे. 

भाजपाचे माजी खासदार असलेले संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला परत जाण्याच्या विधानासह इतरही विविध विषयांवर भाष्य केले आहे. काकडे म्हणाले, राज्य सरकारने कोरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणांकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र ते औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबद्दल बोलत आहे. मात्र औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर केल्यामुळे काहीही एक फरक पडणार नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी तो मुद्दा गौण करून तरुणांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असून मी त्याविषयी काही भविष्य सांगू शकत नाही असेही स्पष्ट केले. 

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून पण निवडून आणू..  पुण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. यानंतर त्या वाक्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले नसते तरच नवल. पण यानंतर पाटील यांनी देखील त्या वाक्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. पण आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमधून निवडणूक लढविण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि विशेष म्हणजे या मुद्द्यावर कुणी विरोधकांनी नाहीतर पुण्यातील भाजपच्या माजी खासदारानेच मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जर पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी त्यांचा प्रचारप्रमुख मी असेल. आणि एवढंच नाही तर तिथून सुद्धा चंद्रकांत दादांना निवडून देखील आणू.   .... आमचे ९८ नगरसेवक कुणाच्याही संपर्कात नाही..भाजपाचे ९८ नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. निवडणुकाजवळ आल्या की अशा बातम्या, चर्चा झडत असतात. आणि सर्वच पक्षात थोड्या फार प्रमाणात नाराजी ही असतेच.पण ती नाराजी दूर करण्याचा जे ते पक्ष प्रयत्न करत असतात.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण