शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

" शहरांच्या नामांतरामुळे काहीही फरक पडणार नाही; त्यापेक्षा..." ; भाजपच्या माजी खासदाराचा टोला

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 20, 2021 21:08 IST

एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे पक्षाच्या एका माजी खासदाराने मात्र आश्चर्यकारक भूमिका घेतली आहे...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून जोरदार घमासान सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी आघाडी व भाजपमधील वरिष्ठ नेतेमंडळी सोडताना दिसत नाही.एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनाकाँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे भाजपच्या एका माजी खासदाराने राज्य सरकारला सल्ला 'हा' खास टोला लगावला आहे. 

भाजपाचे माजी खासदार असलेले संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला परत जाण्याच्या विधानासह इतरही विविध विषयांवर भाष्य केले आहे. काकडे म्हणाले, राज्य सरकारने कोरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणांकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र ते औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबद्दल बोलत आहे. मात्र औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर केल्यामुळे काहीही एक फरक पडणार नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी तो मुद्दा गौण करून तरुणांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असून मी त्याविषयी काही भविष्य सांगू शकत नाही असेही स्पष्ट केले. 

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून पण निवडून आणू..  पुण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. यानंतर त्या वाक्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले नसते तरच नवल. पण यानंतर पाटील यांनी देखील त्या वाक्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. पण आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमधून निवडणूक लढविण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि विशेष म्हणजे या मुद्द्यावर कुणी विरोधकांनी नाहीतर पुण्यातील भाजपच्या माजी खासदारानेच मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जर पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी त्यांचा प्रचारप्रमुख मी असेल. आणि एवढंच नाही तर तिथून सुद्धा चंद्रकांत दादांना निवडून देखील आणू.   .... आमचे ९८ नगरसेवक कुणाच्याही संपर्कात नाही..भाजपाचे ९८ नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. निवडणुकाजवळ आल्या की अशा बातम्या, चर्चा झडत असतात. आणि सर्वच पक्षात थोड्या फार प्रमाणात नाराजी ही असतेच.पण ती नाराजी दूर करण्याचा जे ते पक्ष प्रयत्न करत असतात.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण