शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुष्काळग्रस्तांना दिलासा! १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:30 IST

केंद्राच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस, असा निकष लक्षात घेऊन ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यातील केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे सरकारवर होणारी टीका लक्षात घेता, दुष्काळाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.मंत्रालयातील वॉर रूममध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. उपसमितीचे सदस्य तथा सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, बैठकीला उपस्थित होते. केंद्राच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस, असा निकष लक्षात घेऊन ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 

 या सवलती मिळणार दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे 

 पशुधनासाठी मूरघास राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळ