शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

येसूबाईची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:08 IST

येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते..

ठळक मुद्देइतिहास प्रेमी मंडळातर्फे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेच्या त्रिशताब्दीनिमित्त पुणे ते सातारा रथयात्रा

पुणे : येसूबाईंची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय आहे. येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या या कार्यातून आमच्या फौजा अटकेपार गेल्या. शतके, सहस्त्रके ओलांडली तरीदेखील येसूबाईसाहेबांकडून घेतलेली प्रेरणा आपण विसरू शकणार नाही, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. इतिहास प्रेमी मंडळातर्फे महाराणी येसूबाई यांच्या सुटकेच्या त्रिशताब्दीनिमित्त पुणे ते सातारा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते महाराणी येसूबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानाजवळ रथयात्रेचा शुभारंभ झाला. पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, देवदेवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, प्रा. सु. ह. जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यावेळी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘महाराणी येसूबाई यांचे कार्य खूप मोठे आहे. छत्रपती संभाजी महाराजांनतर सर्व गोष्टी त्यांनी सांभाळल्या. त्यांच्या सुटकेच्या घटनेची आठवण ठेवून त्रिशताब्दी साजरी करणे ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. तसेच त्यांचे कर्तृत्व कधीही विस्मृतीत जाणार नाही.’मोहन शेटे म्हणाले, ‘औरंगजेबाने सन १६८९ साली संभाजी महाराज गेल्यानंतर येसूबाई आणि युवराज शाहू राजांना कैदी बनविले. सन १७०७ मध्ये औरंगजेब मेल्यावर शाहू राजांची सुटका झाली. परंतु येसूबाईंना दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी दिल्लीच्या राजकारणाचा फायदा घेत चातुयार्ने येसूबाईंची सुटका केली. तीस वर्षांची शिक्षा भोगून ४ जुलै १७१९ रोजी येसूबाई राजधानी सातारा येथे आल्या. या घटनेला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल  इतिहास प्रेमी मंडळातर्फे रथयात्रा काढून या घटनेची त्रिशताब्दी साजरी करण्यात आली.’  पुणे ते सातारा राजमाता येसूबाईंच्या पुतळा असलेल्या रथयात्रेस एसएसपीएमएस शिवाजी पुतळा येथून प्रारंभ झाला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे पुतळा येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सातारा येथील पवईनाका शिवाजी पुतळ्यापासून राजवाड्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. 

........... 

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजmarathaमराठा