शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कर्जमाफीसाठी 16 लाख शेतक-यांची नोंदणी, 8 लाख शेतक-यांनी भरले आॅनलाइन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत.

अमरावती, दि. 14 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेवटचे २४ तास शिल्लक आहेत. अमरावती विभागात बुधवारपर्यंत १५ लाख ६० हजार शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात ‘आपले सरकार’ पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे. अद्याप तीन लाख शेतक-यांचे अर्ज भरणे बाकी असल्याने योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.योजनेची १५ सप्टेंबर ही 'डेडलाइन' आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत  प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतरच्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरुवातीपासूनच  योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही, बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाइन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असला तरी एक दिवसच मुदत शिल्लक असल्याने योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे.बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २.१६ लाख अर्जअमरावती विभागात १५ लाख ६० हजार शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली, तर ७ लाख ८२ हजार शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ४,२२,०६४ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली. २,१६,३२६ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात २,२१,३४३ नोंदणी व १,१२,८८१ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,२९,२०९, शेतकºयांची नोंदणी व १,४२,६८५ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात २,१८,८९७ शेतक-यांची नोंदणी व १,०६,५६९  अर्ज भरले  आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४,०५,०३८ शेतक-यांची नोंदणी व २,०३,२६० शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.