शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:51 AM

पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे.

- संजय पाठकनाशिक : महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. पन्नास लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांचा दरडोई पाणीपुरवठा १३५ लिटर्स इतका करण्यात आल्याने धरणातील पाणी आरक्षण तसेच पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होईल. राज्यातील बहुतांश महापालिका व नगरपालिका जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलस्रोतांवर निर्भर आहेत. मोजक्याच महापालिकांनी स्वत:च्या मालकीची धरणे बांधली आहेत. महापालिका क्षेत्रात साधारणत: दरडोई दीडशे लीटर्स पाणीपुरवठ्याचे यापूर्वीचे मानक होते. मात्र त्यात आता बदल केला आहे.महाराष्टÑ जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांनाच १५0 लीटर दरडोईचा निकष लागू केला असून, ५0 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांना मात्र १३५ लीटर इतकाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या मर्यादेचे पालन करण्यासाठी त्याचे दरही त्यानुसारच निश्चित असणार आहेत. निकषानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकांना नियमित दरानुसार पाणीपुरवठा होईल. परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे ११५ ते १४0 टक्के पाण्याचा वापर केल्यास दीडपट दर आकारला जाईल, तर त्याहून अधिक वापर झाल्यास दुप्पट दराने आकारणी होईल. त्यामुळे महापालिकांचे आर्थिक नियोजन आणि पाणीवापराचे लोकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.>तीन पालिका वगळता इतरांना झळमुंबई, ठाणे आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या खेरीज कमी लोकसंख्येच्या अन्य सर्वच महापालिकांना या निर्णयाची झळ बसणार आहे.>पाणी वापराच्या मर्यादा आवश्यक आहेत. परंतु मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास थेट दंड आकारण्यापेक्षा महापालिकांना पाणी बचतीसाठी कालावधी देण्यात यावा. तसेच निकष पाळणाऱ्यांना सवलत द्यावी.- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्तकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग