शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

विदर्भ, मराठवाड्यातील रखडलेल्या १०४ प्रकल्पांना नवसंजीवनी, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:56 IST

राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु असे एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. केंद्राच्या  कॅबिनेटमध्ये याला नुकतीच मान्यता दिली.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्यात निधीअभावी रखडलेले २१ मुख्य व ८३ लघु असे एकूण १०४ प्रकल्पांची कामे आता शासनाच्या ‘बळीराजा नवसंजीवनी’ योजनेंतर्गत पूर्ण होणार आहेत. केंद्राच्या  कॅबिनेटमध्ये याला नुकतीच मान्यता दिली. योजनेसाठी  ६,५९१ कोटी रूपयांचा निधी आवश्यक आहे. यात अणखी वाढ होऊ शकते. मात्र, प्रकल्पासाठी २५ टक्के निधी केंद्र शासन देणार आहे. उर्वरित निधी नाबार्डच्या माध्यमातून केंद्र शासनच कर्ज स्वरूपात उपलब्ध करणार आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळप्रवण १३ जिल्ह्यांतील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. यात विदर्भातील ८१ प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३,८३६ कोटींचा निधी आवश्यक आहे. यातील ९५९ कोटी केंद्र शासन देणार आहे व उर्वरित २,८७७ कोटी केंद्र शासनच नाबार्डकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पतेने मूर्तरूपास येणाºया प्रकल्पामुळे विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर होऊन एक लाख सहा हजार ३२९ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार असल्याने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.जलसिंचन विभागाच्या माहितीनुसार, १३ जिल्ह्यांत अर्धवट स्थितीत असलेल्या या १०४ प्रकल्यांची कामे पूर्ण झाल्यावर एक लाख ४० हजार ३५ हेक्टर सिंचन वाढणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत ३९ हजार ७०६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सोबतच १,८८१.७३ दलघमी पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याने कमी पावसाच्या विदर्भ व मराठवाड्यातील जलस्तरदेखील वाढणार आहे. याविषयीचा प्रस्ताव राज्याने केंद्राच्या जलसंधारण विभागाला पाठविला. मात्र, तो सचिव पातळीवरच रखडला होता. आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने बळीराजा नवसंजीवनी प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यासाठी खºयाअर्थाने संजीवनी ठरणार आहे.

अशी होणार सिंचन क्षमतेत वाढ जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विदर्भात १,०६,३२९ सिंचन क्षेत्र वाढणार यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४२,४३० हेक्टर, अकोला २९,६१५, वाशिम ११,०७५, यवतमाळ १३६४९, बुलडाणा ५,४२४ व वर्धा ४,४२४ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ प्रस्तावित आहे. मराठवाड्यात या प्रकल्पानंतर ३९,७०६ हेक्टर सिंचन क्षेत्रवाढ होणार आहे. यामध्ये औरंगाबाद १६,९६६ हेक्टर, जालना ४,२८५, परभणी २,१००, नांदेड ७,७७८, लातूर ६,३५०, उस्मानाबाद १,७८५ व बीड जिल्ह्यात ४४२ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढ प्रस्तावित आहे.

केंद्रीय कॅबिनेटने मान्यता दिल्याने औपचारिकताच बाकी आहे. प्रकल्पाची किंमत वाढली तरी केंद्र शासनाचा हिस्सा २५ टक्केच राहील. दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथील बैठकीत बुलडाणा जिल्ह्यातील ७,७६४ कोटींच्या जिगाव प्रकल्पाला मान्यता मिळाली.- रवींद्र लांडेकर,मुख्य अभियंता, जलसंपदा

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDamधरण