शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

'पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांचे अलीकडे फोन येऊ लागलेत'; जयंत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 09:35 IST

महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात निवडणुकानंतरचं जे राजकारण झालं असेल ते पहिल्यांदाच घडलं असेल

इस्लामपूर - मागच्या काही काळात अनेक लोकांनी राष्ट्रवादीला रामराम केला, पण अलीकडे हे लोकं फोन करायला लागले आहेत. झाले गेले विसरुन आपण पुन्हा एकदिलाने काम करु, यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण शिकविले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात बेरजेच्या राजकारणाचं महत्त्व यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले आहे असं विधान कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. इस्लामपूर येथे जयंत पाटील यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ताकदीने उभी करण्याची गरज आहे. २०२४ ला राष्ट्रवादीला राज्यात नंबर वन पक्ष म्हणून उभारायाचं आहे. त्यामुळे शरद पवार जे सांगतील ते धोरण आपल्याला पुढे न्यायचे आहे. शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी हातात हात घालून पुढे राहिली तर आगामी काळ आपलाच असेल. शिवसेनासोबत आली आहे त्यामुळे हे सरकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करेल हा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात निवडणुकानंतरचं जे राजकारण झालं असेल ते पहिल्यांदाच घडलं असेल, सकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं तर रात्री भलतंच काय होत असे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुतांश लोकांची मागणी होती. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घेतली. या पक्षांना एकत्र आणून राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा एक होती पण शिवसेनेसोबत सरकार बनवावं का याबाबत शरद पवारांनी राज्यभरातील लोकांना घेतलेला कानोसा यातून हे सगळे घडलं. लोकांच्या अपेक्षा गेल्या ५ वर्ष पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. सरळ माणूस आहे. स्पष्ट वक्ता, खरं बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जाईल. मुख्यमंत्री म्हणून बघण्याची सवय तुम्हाला काही दिवसांत होईल. दुष्काळ, चारा-छावण्या अशा अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर लाख कोटींचे कर्ज आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कर्ज काढली आहेत. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत राज्याची प्रगती थांबली नाही पाहिजे या भूमिकेतून राज्याचा गाढा हाकलला जाईल. आम्हाला थोडा वेळ द्या, प्रसारमाध्यम दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारतात. थोडा वेळ जाऊ द्या, प्रश्न आपोआप मार्गी लागतील. गेल्या ५ वर्षात सांगलीतील दुष्काळाकडे ज्या दृष्टीने पाहिलं पाहिजे होतं तसं झालं नाही. थोडा वेळ या सरकारला द्यावा, सगळ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी माहितीही जंयत पाटील यांनी दिली.   

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे