शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:32 IST

Nagpur Secunderabad Vande Bharat Express Train: महाराष्ट्रात सुरू झालेली ही वंदे भारत ट्रेन सुरू होऊन महिनाही झाला नाही. या ट्रेनकडे प्रवाशांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

Nagpur Secunderabad Vande Bharat Express Train: देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे १२५ हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. यातच वंदे मेट्रोची पहिली ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली असून, वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी सुरू होत आहे. यातच आता देशभरात धावणाऱ्या अनेक वंदे भारत ट्रेन रिकाम्या जात असून, काही ट्रेनमधील ८० टक्के जागा भरत नसल्याचे समोर येत आहे.

देशातील प्रमुख शहरांना, राज्यांना इंटरसिटीसारखे जोडण्याचे काम वंदे भारतने केले आहे. उद्योगधंदे असलेली शहरे, धार्मिक स्थळे असलेली शहरे आदी भाग या वंदे भारतद्वारे जोडण्यात येत आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, बनारस, पुणे या शहरांतून या वंदेभारत ये-जा करतात. असे असले तरी यामध्ये विमानासारखी प्रिमिअम सेवा आहे. यातच अलीकडे तेलंगण राज्याला ५ वी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. गेल्याच महिन्यात सिकंदराबादहूननागपूरला वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 

केवळ २० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत

तेलंगणामध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवासी मिळत नाहीत. जवळपास रिकामीच ही ट्रेन धावत आहे. ही ट्रेन सिकंदराबाद-नागपूर मार्गावर धावते. सध्या या ट्रेनमध्ये क्षमतेच्या तुलनेत केवळ २० टक्के प्रवासी प्रवास करत आहेत. म्हणजेच ही ट्रेन ८० टक्क्यांहून अधिक रिकाम्या जागांवर धावत आहे. या ट्रेनला प्रवासी न मिळण्याचे कारण काय, याबाबत रेल्वे अधिकारी विचारात पडले आहेत. याउलट जवळच्या शहरांमध्ये धावणाऱ्या इतर वंदे भारत ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत आहेत. या ट्रेन १०० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहेत.

एक्झिक्युटिव्ह क्लास कोचमध्ये १० पेक्षा कमी प्रवासी

काही दिवसांपूर्वी ट्रेन क्रमांक २०१०२ सिकंदराबादहून नागपूरला धावली. ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी १२०० हून अधिक जागा रिक्त होत्या, तर ट्रेनची एकूण क्षमता १४४० जागा आहे. तर, एकूण ८८ जागा असलेल्या दोन एक्झिक्युटिव्ह क्लास कोचमध्ये १० पेक्षा कमी प्रवाशांनी आरक्षण केले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. ही वंदे भारत ट्रेन १६ सप्टेंबरला सिकंदराबाद ते नागपूर मार्गावर सुरू झाली. महाराष्ट्रातील नागपूरला रामागुंडम, काझीपेठ आणि सिकंदराबाद या औद्योगिक केंद्रांशी जोडणे हा त्याचा उद्देश होता जेणेकरून या भागातील लोकांना, व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतील.

काही दिवसांत वंदे भारत ट्रेन बंद होणार? 

सिकंदराबाद ते नागपूर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन मोठ्या प्रमाणात रिकामी जात आहे. आता ही गाडी काही दिवस बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. आणखी काही दिवस प्रवाशांनी या ट्रेनकडे दुर्लक्ष केल्यास या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी केली जाऊ शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आताच्या घडीला ही ट्रेन २० डब्यांची असून, भविष्यात ही ट्रेन ८ डब्यांची होऊ शकते. अशा स्थितीत उपलब्ध जागांची संख्या ५०० पेक्षा जास्त कमी होईल. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूरsecunderabad-pcसिकंदराबादTelanganaतेलंगणा