शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:23 IST

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातीलउद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेनंतर, त्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्यांना पती रवी राणा यांच्यासोबत तुरुंगातही जावे लागले होते. आता त्यांनी संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना, महाराष्ट्राला संकटातून वाचवता यावे, यासाठी आपण 11 वेळा हनुमान चालिसा पठण केले, असे म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यसभा आणि विधान परिषदेत जर अशा पद्धतीने मतदान होत असेल तर, महाविकास अघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच भाजपच्या उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करत विजयी केले. आम्ही गेल्या आडीच वर्षांपासून महाराष्ट्राल बुडताना बघत आहोत. महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर व्हायरला हवे. आमदार राज्याचे नुकसान होताना बघू शकत नाहीत आणि लवकरच हे संकट दूर करायला हवे. शिवसेनेतील अतर्गत मतभेदातूनच हे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल, असेही त्या म्हणाल्या. 

राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला -राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र