शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

11 वेळा हनुमान चालिसा पठण केलं! उद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर नवनीत राणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:23 IST

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातीलउद्धव ठाकरे सरकार संकटात आल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेनंतर, त्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्यांना पती रवी राणा यांच्यासोबत तुरुंगातही जावे लागले होते. आता त्यांनी संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना, महाराष्ट्राला संकटातून वाचवता यावे, यासाठी आपण 11 वेळा हनुमान चालिसा पठण केले, असे म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मला तर संकटमोचकांकडूनच आशा आहे, की ते महाराष्ट्र संकटातून वाचवतील. एवढेच नाही, तर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्ला करत, हे सरकार आपल्याच कर्माने पडेल असेही राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, राज्यसभा आणि विधान परिषदेत जर अशा पद्धतीने मतदान होत असेल तर, महाविकास अघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच भाजपच्या उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करत विजयी केले. आम्ही गेल्या आडीच वर्षांपासून महाराष्ट्राल बुडताना बघत आहोत. महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर व्हायरला हवे. आमदार राज्याचे नुकसान होताना बघू शकत नाहीत आणि लवकरच हे संकट दूर करायला हवे. शिवसेनेतील अतर्गत मतभेदातूनच हे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल, असेही त्या म्हणाल्या. 

राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण, भाजपासोबत चला -राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. कट्टर शिवसैनिक आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या धक्क्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा'वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यात मंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड तसेच संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांची 'मन की बात' बोलून दाखवली. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट 'अल्टिमेटम' वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र