शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘राज्यातील ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार’ रवी राणांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:30 IST

Ravi Rana News: आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे.

अमरावती - राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. तसेच काल राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने महाविकास आघाडी सरकार अधिकच अडचणीत येणार असल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे.

रवी राणा राज्यातील घडामोडींबाबत म्हणाले की, आता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लागेल अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावे लागेल. वेळ आली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. तसेच जे जे मंत्री घोटाळेबाज आहेत, त्यांना तुरुंगात टाकावं लागेल.

दरम्यान हे सरकार पडेल का असे विचारले असता रवी राणा म्हणाले की, हे सरकार पाडण्याची गरज नाही. हे तीन तिघाडी सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे. सरकारमधील जे नेते गजाआड जातील आणि जे गजाआड जाण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यावरून वाटतं की हे नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावतील, अशी शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. यणाऱ्या काळात अनिल परब हेसुद्धा तुरुंगात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची चौकशी आणि फाईल पूर्ण झाली आहे. अनिल परब हे गजाआड दिसतील, असा दावाही रवी राणा यांनी केला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRavi Ranaरवी राणाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा