शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘राज्यातील ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार’ रवी राणांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:30 IST

Ravi Rana News: आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे.

अमरावती - राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. तसेच काल राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने महाविकास आघाडी सरकार अधिकच अडचणीत येणार असल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार असून, लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे.

रवी राणा राज्यातील घडामोडींबाबत म्हणाले की, आता महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लागेल अशी परिस्थिती आहे. आज महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावे लागेल. वेळ आली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. तसेच जे जे मंत्री घोटाळेबाज आहेत, त्यांना तुरुंगात टाकावं लागेल.

दरम्यान हे सरकार पडेल का असे विचारले असता रवी राणा म्हणाले की, हे सरकार पाडण्याची गरज नाही. हे तीन तिघाडी सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आहे. सरकारमधील जे नेते गजाआड जातील आणि जे गजाआड जाण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यावरून वाटतं की हे नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावतील, अशी शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. यणाऱ्या काळात अनिल परब हेसुद्धा तुरुंगात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची चौकशी आणि फाईल पूर्ण झाली आहे. अनिल परब हे गजाआड दिसतील, असा दावाही रवी राणा यांनी केला. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारRavi Ranaरवी राणाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा