शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ratnagiri: रत्नागिरीत खेड-दापोली तालुक्यांच्या सीमेवर सापडला किल्ला, अपरिचित इतिहास समोर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 20:00 IST

Ramgad Fort in Ratnagiri: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला असल्याचे समोर आले आहे. हा किल्ला पालगडच्या पूर्वेस समुद्र सपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर स्थित आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणाला समृद्ध असा इतिहासही लाभला आहे. अनेक ऐतिहासिक गड,कोट, किल्ले कोकणात इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. दरम्यान, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवर एक किल्ला असल्याचे समोर आले आहे. या किल्ल्याचं नाव रामगड असून, दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डॉक्टर सचिन जोशी यांनी या किल्ल्याचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. हा किल्ला पालगडच्या पूर्वेस समुद्र सपाटीपासून सुमारे ३९० मीटर उंचीवर स्थित आहे. जवळच असलेल्या पालगडचा हा जोड किल्ला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या किल्ल्याचे सॅटेलाइट फोटो काढण्यात आले असून, त्यामधून तिथे काही बांधकामाचे अवशेष दिसून आले आहेत. आता किल्ल्याबाबत काय नवी ऐतिहासिक माहिती समोर येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कालौघात या किल्ल्यावरील बांधकामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. किल्ल्यावर काही थडगी आणि काही भांड्यांचे अवशेष सापडले आहेत.

नव्याने प्रकाशात आलेला रामगड हा किल्ला पालगडचा जोडकिल्ला आहे. मात्र तो जोडकिल्ला असल्याने त्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. त्यातील एक किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर दुसरा किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यात सापडला आहे.  मात्र नव्याने आढळून आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रामगड या किल्ल्याचं बांधकाम कधी झालं. कुणी केलं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या किल्ल्याचा इतिहास शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र