शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कुरुंदवाडमध्येही तरुणाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 17:18 IST

Rangpanchmi Kolhapur-रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे.

ठळक मुद्देरंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव कोल्हापूर जिल्ह्यातील घटना : पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू

कोल्हापूर : रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे. शिंगणापूर (ता.करवीर) येथील यशराज राजू माळी (वय १६ ) याचा गावातील खाणीत बुडून मृत्यू झाला. माळी कुटुंबिय मुळचे सातारा जिल्ह्यातील आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून त्याला लहानाचा मोठा केला. सध्या तो दहावीत शिकत होता. सकाळी उठून मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला. त्याला पोहायला येत नव्हते. खाणीत उडी मारल्यावर ती कडेला पडल्याने तो गाळात रुतला व त्याकडे कुणाचे लक्ष न गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.कोडोली (ता.पन्हाळा) येथील दोघे मुले विहिरीत बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ ) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ रा. दोघेही कोडोली, ता.पन्हाळा) अशी त्यांची नांवे आहेत. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पाच-सहा मित्रांसोबत अकराच्या सुमारास ती वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेली होती. कपडे विहिरीच्या काठावर काढून ते कठड्यावरच बसले होते. परंतू त्यांचा तोल जावून ते विहिरीत कोसळले. या दोघांनाही पोहता येत नव्हते.

हे दोघे बुडाल्याचे पाहून अन्य शुभम पाथरवटचा भाऊ भितीने ओरडत गावात पळत आला.. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवली परंतू दुपारपर्यंत ती मिळून आली नव्हती. अजूनही त्यांची शोध मोहिम सुरु आहे. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडिल शेतकरी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. शुभमची आई शिलाई मशिन चालवत त्याचे संगोपन करत होती. सामान्य गरिब कुटुंबातील या दोघांच्या मृत्यूने गावांवर शोककळा पसरली.

टॅग्स :HoliहोळीAccidentअपघातkolhapurकोल्हापूर