शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

दिल्लीपर्यंत भीक मागूनही राणेंचे हात रिकामेच ! - शिवसेनेचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:06 AM

भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत

रत्नागिरी/ औरंगाबाद : भाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला. तर, भ्रष्टाचारी राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत म्हणाले, राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही आॅफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ‘महाराष्टÑ स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही; स्वाभिमान कशाशी खातात, हे माहिती नाही, त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार?‘स्वाभिमान’ या शब्दाची त्यांनी विटंबनाच केली आहे. ‘स्वाभिमान’ या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. उपकारांची परतफेड अपकाराने करायची दुसºयाच्या ताटामध्ये घाण करायची. कृतघ्नपणा करून राजकीय हैदोस घालायचा ही राणेंची संस्कृती आहे. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपाने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली़नीतेशकडे खरा स्वाभिमान!आमदार नीतेश राणेंकडे स्वाभिमान आहे. कारण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, असे खा. राऊत यांनी सांगितले असता ‘अजूनतरी’ असे म्हणायचे का, असे विचारताच ते म्हणाले की, नीतेश काँग्रेस पक्षात राहतील, कारण कॉँग्रेसमुळे ते आमदार झाले. राणे पक्ष काढत असताना नीतेशने पितृपे्रम बाजूला ठेवून कॉँग्रेसमध्येच राहणे पसंत केले, त्यामुळे हा त्यांचा खरा ‘स्वाभिमान’ आहे.दोन वेळा शिवसेनेने केले पराभूतजो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करीत होता, त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या उपभोगातून अमाप माया जमवणाºया नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका खा. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केली.पैशाच्या जीवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी, असे सांगून खैरे म्हणाले, त्यांनी आताही भाजपामध्ये जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले; मात्र भाजपावाल्यांनी का घेतले नाही? तरीही भाजपाने प्रवेश न दिल्यामुळे ते सुद्धा अभिनंदनास पात्र असल्याचे खैरे यांनी सांगितले.राणेंकडून बुलेट ट्रेनचे समर्थनआधुनिक, नव्या गोष्टींना विरोध का, असा प्रश्न करीत बुलेट ट्रेनला विरोध करणाºया शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नारायण राणे यांनी मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. मात्र त्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना राणे यांनी चांगलीच दमछाक झाली, पण तरीही त्यांनी नेटाने बुलेट ट्रेनचे समर्थन केले. रेल्वेचा निधी कापून बुलेट ट्रेन येत नाही, त्यासाठी स्वतंत्र कर्ज घेतले आहे. शिवसेना आणि मनसेने आधी करारातील अटीशर्तींचा अभ्यास करावा आणि मगच बुलेट ट्रेनला विरोध करावा, अशी भूमिका राणे यांनी मांडली.सिंधुदुर्गात जल्लोषकणकवली (जि.सिंधुदुर्ग) : नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केल्याची घोषणा मुंबईत केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली येथील राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीसह फटाक्यांची आतषबाजी केली.राणे यांनी नवीन पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली आहे. त्यांचा हा निर्णय आम्हांला संजीवनी देणारा आहे, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना