शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

Bhaskar Jadhav : मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, त्याहून अधिक रामदास कदमांनी ओकली, भास्कर जाधवांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:59 IST

"मी एवढंच सांगेल, की मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते. त्या जनतेसाठी मुंबईत शौचालयाची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण शौचालयाची जेवढी घाण नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे."

 काल रामदास कदमांनी जी सभा घेतली ती संपूर्ण राजकीय वैचारिक बैठकीला छेद देणारी सभा आहे. रामदास कदमांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, तशी आजवर कुणीही वापरलेली नाही. यामुळे, रामदास कदमांनी जी भाषा वापरली, आज हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल, तस-तशी महाराष्ट्रातील जनता विशेषतः महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पुजा करतील. एवढेच नाही, तर रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेल, की मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते. त्या जनतेसाठी मुंबईत शौचालयाची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण शौचालयाची जेवढी घाण नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

"रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात जे विधान केले, ज्यासंदर्भात मी कॅमेऱ्यासमोर तर नाहीच, पण खासगीतही उल्लेख करणार नाही. त्यामुळे हे विधान जेव्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्याने पुजा होईल. मी पुन्हा बोलतो, की मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, त्याहूनही अधिक घाण काल रामदास कदमाने आपल्या तोंडातून ओकलेली आहे," असे भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले आहे.

"मी कधीही कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. रत्नागिरीतील सभा आणि दापोलीत केलेले वक्तव्य, यांत मी वैयक्तीक टीका केलेली नाही. उदय सामंत काय बोलले आणि रामदास कदम मला काय बोलले. हे गेल्या कित्तेयक वर्षांपासून माझ्या मनात होते. योग्यवेळ आल्यानंतर नंतर त्यांचेच शब्द मी त्यांच्या तोंडात घातले आहेत. याचाच अर्थ, त्यांनी ज्या तोंडाने घाण ओकली, तीच घाण मी त्यांच्या तोंडात घातली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही," असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम - तत्पूर्वी, शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. "मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?" असे रामदास कदम यांनी म्हटले होते.

सोनियांच्या नादी लागू नका"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील", असेही रामदास कदम यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे