शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रिपाइं पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा

By देवेश फडके | Updated: February 8, 2021 17:38 IST

आगामी वर्षभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

ठळक मुद्देपाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार - रामदास आठवलेभाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांची घेणार भेटशक्य तिथे भाजपला पाठिंबा देणार - रामदास आठवले

मुंबई : आगामी वर्षभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. यासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची लवकरच भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले. (Ramdas Athawale declared that rpi will contest Assembly elections in five states) 

आगामी वर्षभरात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी येथील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या पाचही राज्यात रिपाइंचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा

शक्य तेथे भाजपला पाठिंबा

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असून, रिपाइंला किमान तीन ते चार जागांवर तिकीट मिळावे, अशी मागणी करणार आहे. शक्य आहे, तेथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत दोघांमध्ये चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. परंतु, आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे, असा चिमटा रामदास आठवले यांनी काढला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांबाबत जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला, असेही आठवले म्हणाले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डा