शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातील : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:04 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले.

मुंबई : "अजितदादा, आपण इतकी वर्ष उगाच वेगळे राहिलो, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं" अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर व्यक्त केली. तर यावरून बोलताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात की, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं. त्यांना काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे. तर गेल्यावेळी २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांना असा निर्णय घ्यायचा होता, तर ते घेऊ शकत होते. महाविकास आघाडीसोबत गेले असते, तर त्याचं सरकार सुद्धा आला असता. पण त्यांना तिकडे जाने वैचारीकदृष्ट्या अशक्य होते, असे आठवले म्हणाले.

मात्र उद्धव ठाकरे यांनी आता जो काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधातील आहे. तर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय फक्त मुख्यमंत्रीपदाच्या हौसेपायी घेतला असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे, अजूनही वेळ गेली नाही. तुमचं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जमणार नाही. प्रत्येक मुद्द्यावरून वाद-विवाद होणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादाला न लागता उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन, बाळसाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत यावे असेही आठवले म्हणाले.