शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे सरकार रामाचे नाही, भिमाचे नाही आणि कामाचेही नाही": रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:50 IST

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर्चा केल्याची रामदास आठवले यांनी सांगितले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची ठाकरे सरकारवर टीकास्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे - रामदास आठवलेपिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न - रामदास आठवले

पालघर : मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर्चा केल्याची रामदास आठवले यांनी सांगितले. विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यात्मक शैलीत जोरदार टीका केली. (ramdas athawale criticised thackeray govt over maratha reservation)

रिपाइंच्यावतीने विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. ''उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भिमाचे, नाही काही कामाचे, अशी बोचरी टीका रामदास आठवले यांनी केली.

बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे

मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊन नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला. त्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा. आगामी जणगणना जातीवर आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल, असेही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न

पालघर तालुक्यात आठ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र आली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल. पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून, त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण