शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

रामदास आठवलेंनी पूरग्रस्तांना केली भरघोस मदत; खासदार, आमदारांनाही आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 18:01 IST

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या.

मुंबई/कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या पुराच्या पाण्यामुळे लाखो लोकांचे संसार बुडाले आहेत. या लोकांना अन्न धान्यापासून कपडेलत्त्याची गरज भासणार आहे. यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कोणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देतोय तर कोणी वेगवेगळ्या संस्थांना. राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनीही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला खासदार निधीतून विभागून मदत देऊ केली आहे. आज त्यांनी हैद्राबादमार्गे कोल्हापूरात येत पूरस्थितीची पाहणी केली. 

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची, मदतीची गरज आहे. या पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले.

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्याला 25 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला 25 लाख असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतून देणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यातील अन्य आमदार, खासदारांनीही त्यांनी मदत देण्याचे आवाहन केले. 

महाराष्ट्रातील सर्व जण माणुसकीचे हात पुढे करीत असून पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशावेळी कोणीही राजकारण न करता माणुसकी जिवंत ठेऊन मदतीसाठी पुढे यावे. तसेच अधिक चांगली मदत पूरग्रस्तांना होण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात, असे आवाहन आठवले यांनी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरRamdas Athawaleरामदास आठवलेfloodपूरSangli Floodसांगली पूरSangliसांगलीSatara Floodसातारा पूर