शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 21:41 IST

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

मुंबई – राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. २५ वर्ष युतीत असलेले शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत(Congress-NCP) घरोबा केला. महाराष्ट्रात याआधी कधीही अस्तित्वात न आलेलं राजकीय समीकरण जुळलं आणि महाविकास आघाडीची स्थापना करत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आले.

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र यावं आणि शिवसेनेचा ५ वर्ष मुख्यमंत्री राहावा असं पुन्हा एकदा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयनं म्हटलं आहे. शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपासोबत पुन्हा महायुतीचे सरकार आणणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी मांडली आहे.

याबाबत रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजपा शिवसेना आरपीआय शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजपा शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजपा आणि शिवसेना यांनी विचार करावा असं आवाहन आठवलेंनी केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा हा नवा फॉर्म्युला रामदास आठवलेंनी मांडला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा विचार करणार का? हे आगामी काळात आपल्याला दिसून येईल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे