शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 21:41 IST

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

मुंबई – राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. २५ वर्ष युतीत असलेले शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत(Congress-NCP) घरोबा केला. महाराष्ट्रात याआधी कधीही अस्तित्वात न आलेलं राजकीय समीकरण जुळलं आणि महाविकास आघाडीची स्थापना करत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आले.

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र यावं आणि शिवसेनेचा ५ वर्ष मुख्यमंत्री राहावा असं पुन्हा एकदा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयनं म्हटलं आहे. शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपासोबत पुन्हा महायुतीचे सरकार आणणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी मांडली आहे.

याबाबत रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजपा शिवसेना आरपीआय शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजपा शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजपा आणि शिवसेना यांनी विचार करावा असं आवाहन आठवलेंनी केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा हा नवा फॉर्म्युला रामदास आठवलेंनी मांडला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा विचार करणार का? हे आगामी काळात आपल्याला दिसून येईल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे