शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 21:41 IST

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.

मुंबई – राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. २५ वर्ष युतीत असलेले शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत(Congress-NCP) घरोबा केला. महाराष्ट्रात याआधी कधीही अस्तित्वात न आलेलं राजकीय समीकरण जुळलं आणि महाविकास आघाडीची स्थापना करत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आले.

मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र यावं आणि शिवसेनेचा ५ वर्ष मुख्यमंत्री राहावा असं पुन्हा एकदा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयनं म्हटलं आहे. शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपासोबत पुन्हा महायुतीचे सरकार आणणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी मांडली आहे.

याबाबत रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजपा शिवसेना आरपीआय शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजपा शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजपा आणि शिवसेना यांनी विचार करावा असं आवाहन आठवलेंनी केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा हा नवा फॉर्म्युला रामदास आठवलेंनी मांडला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा विचार करणार का? हे आगामी काळात आपल्याला दिसून येईल.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे