शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:52 IST

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे राज ठाकरेंच्या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना

पुणे : ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.   ‘‘मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले. वंचित आघाडीचा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता बुधवारी (दि. १०) आठवले पत्रकारांशी बोलत होते. ‘‘आंबेडकर दोनदा खासदार झाले. परंतु, दोन्हीवेळी ते कॉंग्रेस बरोबर होते. भाजपा-शिवसेना किंवा कॉंग्रेस आघाडीसोबत गेल्याशिवाय महाराष्ट्रात निवडून येत नाही. त्यांच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसले. माझ्याही पुण्या-ठाण्यातल्या सभा जोरदार झाल्या,’’ असे आठवले म्हणाले. मी सगळ््या आघाड्यांचे प्रयत्न करुन भाजपासोबत आलो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तिसरी आघाडी  मान्य होत नाही. जिंकण्याइतकी मते तिसºया आघाडीला मिळू शकत नाहीत. ‘वंचित’चा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमत असल्याबद्दल टिप्पणी करताना आठवले म्हणाले, की त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट मोठे असल्याने सभा चांगल्या होतात. पण या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाही. ..................प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रेम‘‘भाजपा आणि शिवसेना यांच्यातले मतभेद टोकाला गेले असतानाही राजकीय परिपक्वता दाखवत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातले वाद टोकाचे नसूनही आमचे वाद मिटत नाहीत. त्यांना माझा तिटकारा का वाटतो हे मला माहिती नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.’’ - रामदास आठवले 

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरgirish bapatगिरीष बापट