शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:52 IST

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे राज ठाकरेंच्या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना

पुणे : ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.   ‘‘मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले. वंचित आघाडीचा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता बुधवारी (दि. १०) आठवले पत्रकारांशी बोलत होते. ‘‘आंबेडकर दोनदा खासदार झाले. परंतु, दोन्हीवेळी ते कॉंग्रेस बरोबर होते. भाजपा-शिवसेना किंवा कॉंग्रेस आघाडीसोबत गेल्याशिवाय महाराष्ट्रात निवडून येत नाही. त्यांच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसले. माझ्याही पुण्या-ठाण्यातल्या सभा जोरदार झाल्या,’’ असे आठवले म्हणाले. मी सगळ््या आघाड्यांचे प्रयत्न करुन भाजपासोबत आलो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तिसरी आघाडी  मान्य होत नाही. जिंकण्याइतकी मते तिसºया आघाडीला मिळू शकत नाहीत. ‘वंचित’चा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमत असल्याबद्दल टिप्पणी करताना आठवले म्हणाले, की त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट मोठे असल्याने सभा चांगल्या होतात. पण या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाही. ..................प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रेम‘‘भाजपा आणि शिवसेना यांच्यातले मतभेद टोकाला गेले असतानाही राजकीय परिपक्वता दाखवत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातले वाद टोकाचे नसूनही आमचे वाद मिटत नाहीत. त्यांना माझा तिटकारा का वाटतो हे मला माहिती नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.’’ - रामदास आठवले 

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरgirish bapatगिरीष बापट