शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:52 IST

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे राज ठाकरेंच्या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना

पुणे : ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.   ‘‘मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले. वंचित आघाडीचा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता बुधवारी (दि. १०) आठवले पत्रकारांशी बोलत होते. ‘‘आंबेडकर दोनदा खासदार झाले. परंतु, दोन्हीवेळी ते कॉंग्रेस बरोबर होते. भाजपा-शिवसेना किंवा कॉंग्रेस आघाडीसोबत गेल्याशिवाय महाराष्ट्रात निवडून येत नाही. त्यांच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसले. माझ्याही पुण्या-ठाण्यातल्या सभा जोरदार झाल्या,’’ असे आठवले म्हणाले. मी सगळ््या आघाड्यांचे प्रयत्न करुन भाजपासोबत आलो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तिसरी आघाडी  मान्य होत नाही. जिंकण्याइतकी मते तिसºया आघाडीला मिळू शकत नाहीत. ‘वंचित’चा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमत असल्याबद्दल टिप्पणी करताना आठवले म्हणाले, की त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट मोठे असल्याने सभा चांगल्या होतात. पण या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाही. ..................प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रेम‘‘भाजपा आणि शिवसेना यांच्यातले मतभेद टोकाला गेले असतानाही राजकीय परिपक्वता दाखवत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातले वाद टोकाचे नसूनही आमचे वाद मिटत नाहीत. त्यांना माझा तिटकारा का वाटतो हे मला माहिती नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.’’ - रामदास आठवले 

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरgirish bapatगिरीष बापट