शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

मी ५० हजार लोक घेऊन तिथं येतो, मग बघू...; नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:40 IST

प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

मुंबई - आपल्या देशात धर्माच्या नावानं राजकारण सुरू आहे. रामाचं नाव घ्यायचे अन् दुसरीकडे द्वेष पसरवायचा याचा आम्ही निषेध करतो. आसाममध्ये राहुल गांधी मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना त्यांना प्रवेश नाकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात दर्शन नाकारणारी प्रवृत्ती सत्तेत आलेत का असा प्रश्न उभा राहतो. भगवान श्री रामाने अहिंसेचा मार्ग आम्हाला शिकवला. परंतु भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला. तो माज उतरवल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही असा निशाणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला आहे. 

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींच्या यात्रेला आसाममध्ये रोखण्याचे काम केले जात आहे. मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखले गेले. यात्रेच्या वाहनावर दगडफेक करणे,  मारहाण करणे हे भगवान श्री रामानं शिकवले का?. आमच्या नेत्यांना मी म्हणालो तुम्ही आवाहन करा, चलो आसाम, मग कुठले मुख्यमंत्री, पंतप्रधान काय करतात ते बघू. तुम्हाला अडवलं तर आम्ही येतो, महाराष्ट्रातून मी ५० हजार लोक घेऊन येतो, देशातून असे लोक तिथे गेले तर काय होईल बघू,  मी माझा विचार राहुल गांधींसमोर मांडला. तेव्हा आपल्याला अहिंसेच्या मार्गातून जायचे आहे. कुठलाही उद्रेक नको. आपण अहिंसा, प्रेमाने जनतेला जिंकायचे. सत्याच्या मार्गाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत करण्यात आले. त्याचा गाजावाजा केला नाही. अयोध्येतील मंदिराबाबत शंकराचार्यांनी विरोध केला. मात्र हे धर्मापेक्षा आणि शंकराचार्यापेक्षा मोठे झाले आहेत. भाजपाला काय उत्सव साजरा करायचा हा अधिकार त्यांचा आहे. भगवान श्रीरामाला लहान आणि मोदींना मोठे करायचे असेल तर काय बोलणार. भगवान श्री रामाला भाजपा लहान मानायला लागले आहेत. भाजपाच्या गर्वाचे हरण आज ना उद्या होणारच आहे. राजीव गांधी यांनी राम मंदिराचा ताळा उघडला होता. त्यांनीच पूजा केली. मात्र कारसेवक, मुस्लीमांचे रक्त भाजपाने वाहिले. जो उद्रेक भाजपाने केला, ज्यांचे जीव गेले त्यांचे काय?. हिंदू शंकराचार्य हे भाजपावर टीका करतायेत. अशा शंकराचार्यांवर भाजपा टीका करते. प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

दरम्यान, रामनाम जपायचे अन् पैसे लुटायचे हे भाजपाचे काम आहे. लोकांकडून लुटलेले पैसे मूठभर मित्रांकडे पाठवले जातात. अपूर्ण मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांनी हे करू नये अशी भूमिका घेतली. पण भाजपाने राजकीय फायद्यासाठी हा इव्हेंट घेतला. त्यामुळे निमंत्रण मिळूनही अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला. अहंमपणा रामाने शिकवला नाही. अहंमपणाचा नाश रामाने केला असं नाना पटोले यांनी म्हटलं.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी