शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत बविआने कुणाला मतदान केलं? हितेंद्र ठाकूर यांनी अगदी तपशीलवार सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 6:37 PM

Rajya Sabha Election Result: काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

मुंबई - काल झालेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या महाविकास आघाडीसोबत असल्याचे दाखवणाऱ्या काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या धनंजय महाडिक यांना मतदान केल्याने निवडणुकीचे चित्र बदलल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी बविआची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असं म्हटलं आहे, अशी विचारणा केली असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, ते काय बोलले हे मला माहिती नाही. मतदान गुप्त असतं. त्यांच्या त्यांच्या पक्षांची मतं ते आपल्या प्रतिनिधील दाखवून टाकतात. मात्र आमच्यासारखे छोटे पक्ष, अपक्षांना मत दाखवण्याचं बंधन नसतं. विधानसभेत अशी एकूण ३० मतं आहेत. त्यामुळे अमूक एक मतं मिळाली नाहीत, असं कुणी सांगू शकत नाही. आम्हाला जेवढे उमेदवार तेवढी मतं देता येतात. आम्ही जे निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगडी, संजय राऊ, पियूष गोयल, अनिल भोंडे आणि मुन्ना महाडिक यांना प्राधान्यक्रमानुसार मतं दिली आहेत, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेले घोडेबाजाराच्या आरोपावरही हितेंद्र ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते समजदार असतील तर असं बोलणार नाहीत. कुठलाही राजकारणी माझ्यावर असा आरोप करणार नाही. मी आमदार आहे घोडा नाही. मी त्यादिवशीही बोललो आहो. नॉट फॉर सेल. मला विकत घेणारा पक्ष बघायचा आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाHitendra Thakurहितेंद्र ठाकूरSanjay Rautसंजय राऊत