शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चारही जागा जिंकणारच! महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे, पवार, खरगेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:57 IST

rajya sabha election 2022 : निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले.  हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्ष तसेच समर्थक अपक्ष आमदार उपस्थित होते.

मुंबई : कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले. हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्ष तसेच समर्थक अपक्ष आमदार उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जून खरगे यांनी केंद्रातील भाजपचे सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करीत असल्याची टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित अपक्ष व लहान पक्षांचे आमदारकॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल असे १३ अपक्ष वा लहान पक्षांचे आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

यापैकी आघाडी सरकार स्थापन होताना विनोद अग्रवाल व गीता जैन हे भाजपसोबत होते. त्यावेळी तटस्थ असलेले माकपचे विनोद निकोले आज उपस्थित होते. प्रहार संघटनेचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू व राजकुमार पटेल मात्र हजर नव्हते. अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या २९ इतकी आहे.

एमआयएमची मते कुणाला? आमची मते हवी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, अशी गुगली एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असदुद्दिन ओवेसी यांनी टाकली. आमदार कुणासोबत जातील की तटस्थ राहतील, हे एक-दोन दिवसांत जाहीर करू, असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्येभाजपचे सर्व आमदार बुधवारी सायंकाळी ६ पासून कुलाब्यातील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी जाणार आहेत. १० जूनला मतदानास जाईपर्यंत त्यांचा या ठिकाणी मुक्काम असेल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांना मार्गदर्शन करतील. मतदानाची पद्धत आमदारांना समजाविली जाईल.

आमदारांच्या नाराजीची ठाकरे, पवारांकडून दखलमहाविकास आघाडीतील तसेच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली. या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचे समाधान करा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीनंतर या विषयी तातडीने बैठका घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. आपण एक आहोत, एकत्रच राहू आणि निश्चितपणे जिंकू. राज्यसभेनंतर विधान परिषदेची निवडणूकही आघाडीच जिंकणार यात कुठलीही शंका नाही.    - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला गाडलं, तेच आपल्याला इथे करायचे आहे. सत्तापिपासू लोक षडयंत्र रचत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. विजय आपलाच आहे. विजयानंतर पार्टी आपल्यालाच करायची आहे.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभा