शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

राज्य बँक घेणार साखर परिषद : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:40 IST

इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल..

ठळक मुद्देउद्योगांच्या अडचणींवर होणार मंथन चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार

पुणे : कर्जदाराचे कर्ज बुडीत झाल्यानंतर बँका संबंधिताची मालमत्ता जप्त करुन उद्योगच बंद करते. मात्र, कारखान्यांची खाती अनुत्पादक (एनपीए) होऊ नये यासाठी बँकांनी देखील आपली भूमिका पार पाडली पाहीजे, या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुण्यात साखर परिषद बोलावली आहे. येत्या शनिवारी (दि. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. रविवारी (दि. ७) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप होईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे आणि व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख या वेळी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्व संध्येला (दि. ५) आयोजित सहकार प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार आयुक्त सतीश सोनी या वेळी उपस्थित राहतील.इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल. कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार, मिटकॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नातू यात सहभागी होतील. रविवारच्या चर्चासत्रात ऊस लागवड, उसावरील रोग व कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, साखरेचा दर्जा आणि वितरण व्यवस्थेवर चर्चा होईल. त्यात कृषी भूषण संजीव माने, जैन इरिगेशनचे अभय जैन, ब्रिटानियाचे उपाध्यक्ष मनोज बालगी यात सहभागी होतील. दुपारी ३ वाजता होणाऱ्या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार आहेत.  कर्ज, त्याची परतफेड अथवा मालमत्ता विकून त्याची वसुली अशी बँकाची भूमिका मर्यादित नाही. बँकेचा पैसा संबंधित उद्योगात गुंतला असल्याने ती देखील एकप्रकारे त्या व्यवसायाची भागीदारच असते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विकून संबंधित व्यवसाय बंद करण्याची भूमिका नसावी. उलट संबंधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा देखील विचार बँकांनी केला पाहीजे, त्यासाठी साखर परिषद आयोजित करण्यात आल्याचे अनास्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारbusinessव्यवसाय