शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:47 IST

राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.  

मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले. मात्र या मंत्रीमंडळात घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे राजू शेट्टी नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपण मंत्रीपद मागितलेच नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे.

भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतोय, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भूमिका आम्ही घेतली होती. भाजप शेतकरीवविरोधी धोरण सातत्याने राबवत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे त्याचेच उदाहरण असल्याचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीचा घटक म्हणून वावरत आहे. पण काम करत असताना आम्ही कधीही मंत्रीपद मागितले नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो कार्यक्रम ठरायला हवा, अशी आमची इच्छा आहे. मात्र माध्यमातून घटकपक्षांना आम्ही सामावून घेऊ अशा बातम्या तिन्ही पक्षांकडून पेरल्या गेल्या. त्याचवेळी शपथविधीला न बोलवणे ही असहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखवल्याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.