शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:47 IST

राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.  

मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले. मात्र या मंत्रीमंडळात घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे राजू शेट्टी नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपण मंत्रीपद मागितलेच नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे.

भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतोय, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भूमिका आम्ही घेतली होती. भाजप शेतकरीवविरोधी धोरण सातत्याने राबवत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे त्याचेच उदाहरण असल्याचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीचा घटक म्हणून वावरत आहे. पण काम करत असताना आम्ही कधीही मंत्रीपद मागितले नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो कार्यक्रम ठरायला हवा, अशी आमची इच्छा आहे. मात्र माध्यमातून घटकपक्षांना आम्ही सामावून घेऊ अशा बातम्या तिन्ही पक्षांकडून पेरल्या गेल्या. त्याचवेळी शपथविधीला न बोलवणे ही असहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखवल्याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.