शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:47 IST

राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.  

मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले. मात्र या मंत्रीमंडळात घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे राजू शेट्टी नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपण मंत्रीपद मागितलेच नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे.

भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतोय, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भूमिका आम्ही घेतली होती. भाजप शेतकरीवविरोधी धोरण सातत्याने राबवत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे त्याचेच उदाहरण असल्याचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीचा घटक म्हणून वावरत आहे. पण काम करत असताना आम्ही कधीही मंत्रीपद मागितले नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो कार्यक्रम ठरायला हवा, अशी आमची इच्छा आहे. मात्र माध्यमातून घटकपक्षांना आम्ही सामावून घेऊ अशा बातम्या तिन्ही पक्षांकडून पेरल्या गेल्या. त्याचवेळी शपथविधीला न बोलवणे ही असहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखवल्याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.