शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके : कलगीतुरा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:47 IST

politics, Raju Shetty , Sadabhau Khot, Sangli , kolhapur, Swabimani Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके फुटले. खोत यांनी वेळप्रसंगी राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावू, असे जाहीर वक्तव्य करून स्वाभिमानीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यावर पलटवार करताना शेट्टी यांनी, फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांचे हात व चारित्र्य अस्वच्छ आहे, अशी टीका केली. ​​​​​​​

ठळक मुद्देराजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके : कलगीतुरा रंगला फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे शेट्टींचा पलटवार

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके फुटले. खोत यांनी वेळप्रसंगी राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावू, असे जाहीर वक्तव्य करून स्वाभिमानीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यावर पलटवार करताना शेट्टी यांनी, फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांचे हात व चारित्र्य अस्वच्छ आहे, अशी टीका केली.भाजपने पुणे पदवीधर निवडणुकांसाठी खोत यांनी रयत क्रांतीचा स्वतंत्र उमेदवार दिला होता. राजू शेट्टी यांनी प्रस्थापितांची साथ सोडली, तर निश्चितपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असे वक्तव्य खोत यांनी सोमवारी केले होते. त्यावर शेट्टी यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही.

स्वत:चे अस्तित्व दाखविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ज्या ठिकाणी आहेत, तेथून आणखी काही तरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर कडकनाथ योजनेमधील पैसे परत करा, शेतकऱ्यांबद्दल पुतनामावशीचे प्रेम दा‌खवू नका, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांच्या टीकेनंतर खोत यांनीही पलटवार केला. ते म्हणाले की, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या अंगणात आमदारकीसाठी लोटांगण घालत गेलेत. राजू शेट्टी यांचे हात स्वच्छ आहेत, हे मला माहीत आहे. हेच हात आमच्या हातात होते, तेव्हा शेट्टी रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत होते का? आता काय रोज गोमूत्राने आंघोळ करतात काय? 

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला आपण फारसे महत्त्व देत नाही. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी ते काहीही बरळत असतात. अशा फालतू माणसाच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही.- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना