शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध कायम- राजू शेट्टी

By admin | Published: May 30, 2015 2:03 AM

बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत भुमिअधिग्रहन कायद्यामध्ये दोन सुधारणा करण्याची मागणी.

बुलडाणा: भुमि अधिग्रहन कायदा हा जुना आहे. तसा हा कायदा शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेला आहे. संसदेत आम्ही व काही घटक पक्षाने या कायद्याला विरोध दर्शविल्यामुळेच या कायद्यामध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत ९ सुधारणा केल्या आहेत; मात्र अद्याप दोन सुधारणा या कायद्यामध्ये अजूनही बाकी असून जो पर्यंत ह्या सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत या कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध राहील अशी भुमिका खा. राजू शेट्टी यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे बुलडाणा जिल्ह्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या सोबत यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, सतिष बुरुळकर, योगेश पांडे, गजानन अमदाबादकर उपस्थित होते. खा. राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही सत्तेत असतानाही शेतकर्‍यांच्या हीतासाठी भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध केला. त्यातून सरकारला या कायद्यामध्ये ९ सुधारणा कराव्या लागल्या. अद्याप दोन सुधारणा बाकी आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या परवाणगी शिवाय जमिन अधिग्रहीत करू नये आणि ५ वर्षात प्रकल्प उभा न राहल्यास जमिन शेतकर्‍यांना परत करावी. अशा ह्या दोन सुधारणा आहेत. ह्या सुधारणा जो पर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंंत या कायद्याला आमचा विरोध असेल. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्यावे हे सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही याची खंत व्यक्त करताना शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक होणे आवश्यक होती, दुर्दैवाने तेही होतांना दिसत नसल्याचे खा. शेट्टी यांनी सांगीतले. यावर तुमच्या मागण्या सरकार मान्य करत नसेल तर सरकारमधून बाहेर पडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरात मात्र आम्ही संघर्ष करू येवढेच उत्तर खा. राजू शेट्टी यांनी दिले.

*सरकारच्या मागे कटोरा घेवून फिरणार नाही!

     केंद्रात सत्ता आल्यास सत्तेत वाटा द्यावा अशी आमची मागणी होती. विस्तारीत मंत्रीमंळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रीपद देण्याचे कबुल सुध्दा केले आहे. मात्र दिलेला शब्द पाळणे सरकार कर्तव्य आहे. आम्ही मंत्रीपदासाठी त्यांच्या मागे कटोरा घेूवन फीरणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत असा टोला. खा. राजू शेट्टी यांनी मारला.

*हे तर शेतकरी चळवळीचे अपयश

      विदर्भातील शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आत्महत्या थांबता थांबेनात, शेतकरी आत्महत्येला कारणे अनेक असतील पण ,यावर कायमस्वरूपी उपाय अद्याप आम्ही शोधू शकलो नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत हे शेतकरी चळवळीचे अपयश आहे. या बद्दल आम्हालाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे अशी कबुली देत खा. राजू शेट्टी म्हणाले की, आता यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद विदर्भाला आम्ही मुद्दाम दिले. या माध्यमातून या भागात शेतकरी चळवळ उभी करून शेतकर्‍यांना शेतीला उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी येणार्‍या काळात रविकांत तुपकर काम करतील असे त्यांनी सांगीतले.