शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

"सुशांतच्या आत्महत्येबाबत चर्चा झाली, तेवढी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 22:26 IST

आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची चर्चा फारशी होत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. 

ठळक मुद्देकोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

कोल्हापूरः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, आता स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनीही यावर भाष्य केले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या? यावर कोणी चर्चा करणार आहेत का? असा उद्विग्न सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे, तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर सर्व प्रश्न सुटले असते. आत्महत्या करणारा कोण आहे, हे बघून चर्चा होणार असेल तर आपण कुठे निघालो आहोत हे लक्षात येते. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची चर्चा फारशी होत नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. 

याशिवाय, एका अभिनेत्याने केलेल्या आत्महत्येची केवढी चर्चा होते, रोज पोलीस नवनवीन माहिती देत आहेत, तपासाला रोज नवीन दिशा मिळत आहे, त्याच्याकडे असलेल्या कोटी-कोटी रूपयांची चर्चा होत असताना शेतकरी मात्र रूपयाला महाग झाला आहे. त्याला एकेक रूपया म्हणजे गाडीचे चाक वाटत आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

याचबरोबर, कोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे, रीडिंगही गेल्या वर्षीच्या सरासरीने काढले आहे, त्यामुळे स्थिर आकारही वाढला आहे, त्यामुळे विजबिल वाढून आला आहे. क्रिकेट पटू पासून सामान्य नागरिकांपर्यंत विजबिल वाढलेले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी हि चेष्टेचा विषय बनली आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMaharashtraमहाराष्ट्र