शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो!; उद्धव ठाकरेंचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 15:13 IST

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.

ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांची गुगली: मोदींना सांगा विदर्भात समुद्र देतील

संजय पाठक

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.

नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या उध्दव ठाकरे यांनी हॉटेल ताज येथे पत्रकार परिषदेत बोलतांना हे विधान केले. नाणार येथील प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे यांनी नाणार येथील प्रकल्पाची अधिसूचना आम्ही रद्द केल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. मात्र, हा प्रकल्प विदर्भात द्या अशी विदर्भातील भाजपा आमदारांचीच मागणी असून ती योग्यही आहे. विदर्भाचा विकास करण्याची केवळ भाषा करून चालणार नाही. तर त्याचा विकासही केला पाहिजे, त्यादृष्टीने तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प विदर्भात करावा अशी सूचना करताना त्यांनी देशात सात ठिकाणी समुद्र किनारा नसलेल्या ठिकाणी अशाप्रकारचे तेल शुध्दीकरणाचे कारखाने आहेत. मग, हा कोकणवासियांचा विरोध असेल तर विदर्भात हा प्रकल्प करण्याची मागणी पूर्ण करण्यास हरकत काय, या प्रकल्पासाठी समुद्र किनाºयाचीच गरज असते, असे जर मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर मोदींना सांगा ते पाच मिनीटात समुद्र आणतील असे ठाकरे म्हणाले. अलिकडे रजनीकांतही मोदींना घाबरतो असे मिश्कीपणे ते म्हणाले अर्थात हे गंमतीने घ्या नाही तर माझ्यात आणि रजनीकांतमध्ये अकारण वाद लागून जाईल असेही ते म्हणाले.स्वबळाचा नारा कायमआगामी विधानसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीने त्याबाबत निर्णय घेतला आहे त्यात बदल केला जाणार नाही. शिवसेना भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. पंधरा वर्षे एकमेकांविरूध्द भांडून सत्तेत राहणारे आता एकसंघ निवडणूक लढवायाला निघाले असले तरी गेली ६५ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती, पंधरा वर्षे राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर होती. त्यामुळे त्यांचा कारभार कसा आहे, हे सर्वांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर विधान परिषद निवडणूकीत सहा पैकी तीन जागांवर कागदारवर शिवसेनेचे सदस्य संख्या बघता निवडून येण्याची शक्यता असल्याने पक्षाने उमेदवार केले आहे. गेली २५ वर्र्षे भाजपाशी युती असल्याने त्याबाबत संभ्रम असणे स्वााभाविक असल्याचे सांगत व्यक्तीगत संबंध, ऋणानुबंध लक्षात घेऊन मते मिळवण्याचा सल्ला आपण विधान परिेदेती उमेदवारांना दिल्याचे ते म्हणाले.भुजबळ- खडसेंवर बोलले नाहीत..राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामिन अर्ज मंजूर झाला. तसेच एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली यावर उध्दव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. जे घडले ते सर्वांसमोर आहे त्यात काय वेगळं बोलणार असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे