शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो!; उद्धव ठाकरेंचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 15:13 IST

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.

ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांची गुगली: मोदींना सांगा विदर्भात समुद्र देतील

संजय पाठक

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.

नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या उध्दव ठाकरे यांनी हॉटेल ताज येथे पत्रकार परिषदेत बोलतांना हे विधान केले. नाणार येथील प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे यांनी नाणार येथील प्रकल्पाची अधिसूचना आम्ही रद्द केल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. मात्र, हा प्रकल्प विदर्भात द्या अशी विदर्भातील भाजपा आमदारांचीच मागणी असून ती योग्यही आहे. विदर्भाचा विकास करण्याची केवळ भाषा करून चालणार नाही. तर त्याचा विकासही केला पाहिजे, त्यादृष्टीने तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प विदर्भात करावा अशी सूचना करताना त्यांनी देशात सात ठिकाणी समुद्र किनारा नसलेल्या ठिकाणी अशाप्रकारचे तेल शुध्दीकरणाचे कारखाने आहेत. मग, हा कोकणवासियांचा विरोध असेल तर विदर्भात हा प्रकल्प करण्याची मागणी पूर्ण करण्यास हरकत काय, या प्रकल्पासाठी समुद्र किनाºयाचीच गरज असते, असे जर मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर मोदींना सांगा ते पाच मिनीटात समुद्र आणतील असे ठाकरे म्हणाले. अलिकडे रजनीकांतही मोदींना घाबरतो असे मिश्कीपणे ते म्हणाले अर्थात हे गंमतीने घ्या नाही तर माझ्यात आणि रजनीकांतमध्ये अकारण वाद लागून जाईल असेही ते म्हणाले.स्वबळाचा नारा कायमआगामी विधानसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीने त्याबाबत निर्णय घेतला आहे त्यात बदल केला जाणार नाही. शिवसेना भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. पंधरा वर्षे एकमेकांविरूध्द भांडून सत्तेत राहणारे आता एकसंघ निवडणूक लढवायाला निघाले असले तरी गेली ६५ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती, पंधरा वर्षे राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर होती. त्यामुळे त्यांचा कारभार कसा आहे, हे सर्वांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर विधान परिषद निवडणूकीत सहा पैकी तीन जागांवर कागदारवर शिवसेनेचे सदस्य संख्या बघता निवडून येण्याची शक्यता असल्याने पक्षाने उमेदवार केले आहे. गेली २५ वर्र्षे भाजपाशी युती असल्याने त्याबाबत संभ्रम असणे स्वााभाविक असल्याचे सांगत व्यक्तीगत संबंध, ऋणानुबंध लक्षात घेऊन मते मिळवण्याचा सल्ला आपण विधान परिेदेती उमेदवारांना दिल्याचे ते म्हणाले.भुजबळ- खडसेंवर बोलले नाहीत..राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामिन अर्ज मंजूर झाला. तसेच एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली यावर उध्दव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. जे घडले ते सर्वांसमोर आहे त्यात काय वेगळं बोलणार असा प्रश्नही त्यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे